अवकाळी पावसाने झालेल्या पिकनुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई जाहीर करा – पाटील

अवकाळी पावसाने झालेल्या पिकनुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई जाहीर करा - पाटील

करमाळा  – करमाळा मतदार संघातील अवकाळी पावसाने झालेल्या पिकनुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या कडे केली आहे.

राज्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा फटका करमाळा तालूक्यासह माढा तालुक्यातील 36 गावांनाही बसल्याने आज माजी आमदार नारायण पाटील यांनी याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे शेतकऱ्याला आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी असे साकडे घातले तर जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून महसुल खात्याकडून पिकनुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

याबाबत बोलताना पाटील म्हणाले की करमाळा तालुक्यातील शेतकरी वीज संकटातून स्वतःला सावरत असताना आता आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्याने पहात आहे.  शेतकऱ्यांना आता शासनाकडून आर्थिक मदतीची गरज असुन यासाठी महसुल तसेच कृषीविभागाने योग्य ती कार्यवाही सुरु केली पाहिजे अशी मागणी आपण केली आहे.

रब्बी पिकांवर या पावसाचा परिणाम झाला असून ज्वारी, गहु, मका, तुर यासह कांदा या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका केवळ जिरायत अथवा रब्बी पिकधारकांनांच बसला असे नसुन करमाळा तालुक्यातील ऊस व केळी उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे. ऊसतोडणी चालू असल्याने तोडलेला ऊस पावसाच्या पाण्यामुळे शेतातील सरीत अडकुन बसला आहे. ऊस वाहतुक करुन कारखान्यापर्यंत पोहचवण्यासाठी आता त्याला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत आहेत. तर केळी या पिकावरही फार मोठे संकट आले आहे.

आशिया खंडातील चांगल्या दर्जेदार केळीचा पट्टा म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या करमाळा तालूक्यातील या भागात आता अवकाळी पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. यामुळे केळीचे भाव गडाडले असुन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व बाबींचा गंभीरतेने विचार करुन महसुल व कृषीविभागाने प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे तयार करावेत. या नुकसानभरपाई बाबतचा अहवाल तातडीने वरीष्ठ कार्यालयास पाठवावा तरच आगामी काळात पिकनुकसानभरपाईस शेतकरी पात्र ठरतील. या नुकसानभरपाई साठी आपण पाठपुरावा करत असुन संकटकाळी शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले

Previous Post
परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार; पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना यश 

परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार; पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना यश 

Next Post
गेंड्याच्या कातडीचे ‘गेंडा स्वामी', MVA सरकारमध्ये असल्यामुळे राज्याचं वाटोळं होतंय…!

गेंड्याच्या कातडीचे ‘गेंडा स्वामी’, MVA सरकारमध्ये असल्यामुळे राज्याचं वाटोळं होतंय…!

Related Posts

एसी घेताना नेहमी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा; आयुष्यात कधीही पश्चाताप वाटणार नाही

पुणे – उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच पंखा आणि एसीची आठवण येते. आज आपण या लेखात जाणून घेणार…
Read More
जिओ

रिलायन्स इन्फ्राटेलचे मोबाइल टॉवर आणि फायबर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जिओने ₹3,720 कोटी जमा केले

Reliance Infratel Limited: देशातील आघाडीच्या टेलिकॉम रिलायन्स जिओची उपकंपनी असलेल्या रिलायन्स प्रोजेक्ट्स आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेसने रिलायन्स इन्फ्राटेलचे…
Read More

Elvish Yadav: बिग बॉस विजेता एल्विश यादवला फोनद्वारे एक कोटींची खंडणी देण्याची धमकी

Elvish Yadav Extortion call: बिग बॉस ओटीटी 2 चा (Big Boss) विजेता एल्विश यादवबद्दल (Elvish Yadav) मोठी बातमी…
Read More