Nanded News | नांदेड जिल्ह्यातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असतानाच, धर्माबाद तालुक्यातील राजापूर गावात विलास शिंदे राजपुरकर या युवकाने गटाराच्या पाण्यात आंघोळ करून सरकारच्या निष्क्रियतेचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
गेल्या 10 वर्षांत राजापूर ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असूनही, गावकऱ्यांची पाण्यासाठी रोजची धावपळ सुरूच आहे. पाण्याच्या एक थेंबासाठी त्यांना अनेक किलोमीटर अंतर कापावं लागतं, तर अनेकदा पाणी विकत घेण्याची वेळही येते.
या पार्श्वभूमीवर राजपुरकर यांनी पाणीपुरवठा Nanded News()योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रकाश टाकत, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट गटारात उतरून आंदोलन केले. त्यांच्या या कृतीमुळे गावात खळबळ उडाली असून, स्थानिक प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासकीय उदासीनतेमुळे आणि निधीच्या गैरवापरामुळे गावात पाण्याचा प्रश्न सुटत नाही. राजपुरकर यांचे हे आंदोलन सामान्य ग्रामस्थांच्या आवाजाचे प्रतीक ठरत असून, यामुळे शासनाला जाग येईल अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“मी गोमूत्र खूप पितो”, नितेश राणेंचं विधान चर्चेत
काँग्रेस सोडण्याची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी सगळंच सांगितलं | Sangram Thopte
२६/११ हल्ल्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, भाजप नेत्याचा गंभीर आरोप