Chhagan Bhujbal | येवला मतदारसंघासाठी खतांचे जेवढं आवांटन मंजूर आहे तेवढं खते उपलब्ध करून घ्यावी. खते व बी बियाणे यांचा बफर स्टॉक करून ठेवण्यात यावा. तसेच मागणी असलेल्या गावांना तातडीने पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली आज येवला संपर्क कार्यालयात मान्सूनपूर्व खरीप हंगाम व विविध विकास कामांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडी, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, येवला गटविकास अधिकारी संदीप वायाळ,निफाड गटविकास अधिकारी जाधव तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड,कार्यकारी अभियंता एस.एस.चिकोडे, उपअभियंता व्हि. व्हि. निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकाडे, उपअभियंता अनिल गर्जे, गणेश रहाटळ, सहायक निबंधक के. डी.गायकवाड, विमा अधिकारी आर.बी.शिंदे, सहकार अधिकारी नेहा भामरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सध्या ३२ गावे आणि ८५ वाड्यांना ३५ टँकर द्वारे ६५ फेऱ्या सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्या गावांची टँकरची मागणी येईल तिथे तात्काळ टँकर चालू करण्यात यावे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास पाठवावा तसेच खरिपाच्या पार्श्वभूमीवर बी बियाणे, खतांचा बफर स्टॉक करावा अशा सूचना केल्या. तसेच पीक कर्ज, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत आढावा घेतला.
पावसाळा पूर्व कामे तत्काळ सुरू करावे, शहर स्वच्छता आणि नाले सफाई साठी विशेष मोहीम राबविण्याबाबत यावेळी भुजबळ यांनी सूचना केली. तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची स्थिती, येवला शहर पाणीपुरवठा स्थिती तसेच येवला व ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, राजापूर व ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, विंचूर लासलगाव १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची स्थिती याबाबत आढावा घेतला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!
‘आम्ही तणाव वाढवत नाही, पण प्रत्युत्तर देणारच’; भारताचा स्पष्ट इशारा
दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द