Pune News | पहलगाम (काश्मीर) येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यातील पर्यटन व्यावसायिकांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे शांततेचा कॅंडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला.
या कॅंडल मार्चचे आयोजन पुण्यातील सर्व ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनच्या पुढाकाराने करण्यात आले होते. TAAP, TAAI, TAFI, ETAA, ETPA, BPVSL, SKCAL, ADTOI, उज्वल विकास आणि इतर पर्यटन संस्थांनी सहभाग (Pune News ) घेतला.
मेणबत्त्या पेटवून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी काश्मीरमधील शांतता आणि पर्यटनाला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात निलेश भन्साळी, दीपक पुजारी, अमित पंडित, अनिकेत केकर, विवेक गोळे, अखिलेश जोशी, विजय मंडलिक, मेहबूब शेख, समीर कुलकर्णी, जी. कृष्णा, संतोष खवले, दुष्यंत देसाई, शशांक कुलकर्णी, अमित बोराडे, मंदार सात्रे, प्रसाद सेठ, मनीष केळकर, श्रीकांत जगताप, प्रमोद बिडकर यांच्यासह अनेक पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते. हल्ल्याचा निषेध करताना उपस्थितांनी देशप्रेम, शांतता आणि एकतेचा संदेश दिला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भारताने अटारी सीमा बंद केली, पाकिस्तानला मोठा धक्का बसणार; ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
डांबरातून काळ्याचे पांढरे करणे बंद झाल्याने त्यांची बोंबाबोंब सुरुय, शिंदे यांचा उबाठावर निशाणा
दहशतवाद्यांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार, आता जमिनीत गाडण्याची वेळ आलीय; नरेंद्र मोदींचा इशारा