पंजाब, राजस्थानेन करून दाखवलं तुम्ही कधी करणार?, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली असून सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला त्याचपद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान म्हणतात, केंद्र सरकारने मागील सात वर्षात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून १०० रुपये प्रति लिटर रुपयांच्यावर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तुंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. कोरोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे.

पेट्रोल डिझेलवरील कररुपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही, त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे परंतु जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. राज्यातील जनतेच्या हितासासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, असे नसीम खान म्हणाले.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

आगरा येथील शिवाजी महाराजांचे स्मारक तरुणाईला प्रेरक ठरेल !

Next Post

अब तक 56 चित्रपटात धमाकेदार भूमिकेत दिसला होता बाबासाहेब पुरंदरे यांचा मुलगा;

Related Posts
Uddhav Thackeray

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंना आणखी खासदाराचे पत्र

मुंबई – मुंबईतील खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) पत्र…
Read More
पाकिस्तानला मिळणार नवा कर्णधार, या अनुभवी खेळाडूची लागू शकते वर्णी

पाकिस्तानला मिळणार नवा कर्णधार, या अनुभवी खेळाडूची लागू शकते वर्णी

Pakistan new captain | मोहम्मद रिझवानची पाकिस्तानच्या वनडे आणि टी20 संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते.…
Read More
जास्त भात खाल्ल्याने त्वचेला होऊ शकते नुकसान, तांदूळ आणि पोह्यांमध्ये शरीरासाठी काय आहे चांगले?

जास्त भात खाल्ल्याने त्वचेला होऊ शकते नुकसान, तांदूळ आणि पोह्यांमध्ये शरीरासाठी काय आहे चांगले?

लोक नाश्त्यात पोहे खातात कारण ते तेलमुक्त, चरबीमुक्त असते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वजन कमी करण्यात पोहे अत्यंत…
Read More