‘अरे कॉंग्रेसवाल्यांनो, तुमची बुद्धी भ्रष्ट झाली का? तुम्ही मोदीजींचं काहीच बिघडवू शकणार नाही’
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना भटिंडा विमानतळावरून फिरोजपूरला हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गावर काही शेतकरी आंदोलन करत असल्यामुळे पंतप्रधानांच्या ताफ्याला साधारण 15 ते 20 मिनिटं वाट पाहत थांबावं लागली होती.
त्यानंतर सुरक्षेतील त्रुटी लक्षात आल्यामुळं पंतप्रधानांना नियोजित कार्यक्रम रदद् करून दिल्लीला परत यावं लागलं होतं. या प्रकरणात पंजाब राज्य सरकारकडून पंतप्रधानांना सुरक्षा देण्यात कसूर झाल्याचा ठपका केंद्रीय गृहमंत्रालयानं ठेवला आहे. दरम्यान, पंजाब सरकारवर भाजपच्या नेत्यांची टीकेची झोड उठवली आहे. पंजाबमधील काँग्रेस नेत्यांवर देशभरातील भाजप नेत्यांनी निशाणा साधत मोदींसोबत पंजाबमध्ये जे झालं, त्याला कारणीभूत ठरवलंय.
Congress Ke Logo Punjab Ko Badnam Mat Karo ..#BharatStandsWithModiJi pic.twitter.com/jmnXM0BX86
— Raju Srivastav (@iRajuSrivastava) January 5, 2022
याच पार्श्वभूमीवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवनं व्हिडिओ शेअर करत कॉंग्रेसवर संताप व्यक्त केलाय. राजूनं व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधत टीका केलीय. तो म्हणाले, नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला वाघ एकदा जखमी झाला की संपूर्ण जंगल शांत होऊन जातं. अरे कॉंग्रेसवाल्यांनो, तुम्ही मोदीजींचं काहीच बिघडवू शकणार नाही. कारण, मोदीजींवर गुरुनानक देव, बाबा केदारनाथ, बाबा विश्वनाथ, बाबा महाकाल यांचा आशीर्वाद आहे. नकली शेतकऱ्यांना पुढं करुन पंजाबची बदनामी का करता? आपल्या पंतप्रधानांना अपमानित का करत आहात? तुमची बुद्धी भ्रष्ट झालीय का असं व्हिडिओत राजू बोलताना दिसतोय.