समीर वानखडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा, रामदास आठवले आक्रमक

ramdas aathwale - sameer wankhede - malik

मुंबई : समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित खोडसाळ आहेत. नवाब मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही चुकीची आहे. समीर वानखेडे यांचं चारित्र्यहीन करण्याचं काम नवाब मलिक यांनी थांबावावं आणि त्यांना जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. समीर वानखडे यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकार ने संरक्षण द्यावे. समीर वानखडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला.

मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी हा ईशारा दिला आहे. आर्यन खान यांच्या विरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे न्यायालयात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. कारवाई करताना पुरावे नसते तर न्यायालयाने तात्काळ आर्यन खान यांना जमीन दिला असता. याबाबत समीर वानखडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. समीर वानखडे यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. असं आठवले म्हणाले आहेत.

ड्रग्सच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम नारकोटिक्स विभाग करीत आहे.तेच काम समीर वानखडे करीत आहे. युवा पिढीला ड्रग्सच्या विळख्यातून वाचविण्याचे काम देशहिताचे असून असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नसून उलट आशा अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले पाहिजे. त्यामुळे समीर वानखडे यांच्या केसाला ही धक्का लागला तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao

Previous Post
kiran gosavi - prabhakar sail

एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली, गोसावीच्या बॉडीगार्डचे धक्कादायक खुलासे

Next Post
ramdas aathwale - sameer wankhede

वानखडे हे मागासवर्गीय अधिकारी असून त्यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर… – आठवले

Related Posts
chagan bhujbal

घोडेबाजाराला कोण बळी पडणार नाही; छगन भुजबळांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई   – भाजपने राज्यसभा निवडणूकीत जास्त उमेदवार दिला. मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील आता विधानपरिषदेच्या निवडणूकीतही तयारी करावी…
Read More
गुजरातधार्जिण्या नव्या भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये | Nana Patole

गुजरातधार्जिण्या नव्या भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये | Nana Patole

Nana Patole | निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले…
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्यानंतर खंदे समर्थक प्रमोद नाना भानगिरे यांचे पत्र व्हायरल..!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्यानंतर खंदे समर्थक प्रमोद नाना भानगिरे यांचे पत्र व्हायरल..!!

Pramod Nana Bhangire | महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निकालानंतर विधानसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी…
Read More