शेतकऱ्यांना भडकवणाऱ्या राकेश टिकेत सारख्या नेत्यांवर कारवाई करावी – रामदास आठवले

शेतकऱ्यांना भडकवणाऱ्या राकेश टिकेत सारख्या नेत्यांवर कारवाई करावी - रामदास आठवले

मुंबई – कानून वापसी तो घर वापसी अशी घोषणा करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. सरकार ने तिन्ही कृषी कायदे रद्द केले असताना शेतकरी नेत्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे.तरीही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना भडकवीणाऱ्या राकेश टिकेत सारख्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आठवले म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.कृषी कायदे रद्द केल्याने आता शेतकऱ्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे. कायदे रद्द केल्यास आंदोलन थांबविणार असा शब्द शेतकरी नेत्यांनी दिला होता तो शब्द शेतकरी नेत्यांनी पाळला नाही. ही गद्दारी आहे.नीतिमत्ता नसलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे. शेतकरी आंदोलन आता थांबविले पाहिजे.

शेतकरी नेते आता शेतकऱ्यांना आंदोलनात डांबून त्यांना त्रास देत आहेत.दीर्घ काळ चाललेले आंदोलन कृषी कायदे रद्द झाल्याने बंद केले पाहिजे. राकेश टिकेत सारखे नेते शेतकऱ्यांना न्याय देण्याचा नावाने आंदोलनात ठेऊन अधिक त्रास वाढवीत आहेत.कानून वापसी तो घर वापसी हा शब्द राकेश टिकेत पाळत नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे रामदास आठवले म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=f7tTxoGti_0

Previous Post
करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट!

करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट!

Next Post
'महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार'

‘महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार’

Related Posts

राम गोपाल वर्मांनी प्रोमोशनसाठी ओलांडल्या सर्व मर्यादा! अभिनेत्रीच्या पायाशी बसले अन्…

कधीकाळी बॉलीवूडच्या टॉप दिग्दर्शकांपैकी एक राहिलेले दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Director Ram Gopal Varma) सध्या फक्त तेलुगू सिनेमांचे…
Read More
gopichand padalkar and sadabhau khot

काही जणांचा राग केव्हाही कुठेही कसाही बाहेर पडू शकतो; राष्ट्रवादीच्या नेत्याची पडळकर-खोत यांना वार्निंग 

  पुणे – मागील काही दिवसांपासून भाजपाचे  विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar)व रयत क्रांती संघटनेचे नेते…
Read More
"जर सलमान आणि सैफसारखे लोक सुरक्षित नसतील तर...", काँग्रेसच्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा!

“जर सलमान आणि सैफसारखे लोक सुरक्षित नसतील तर…”, काँग्रेसच्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा!

मुंबईमध्ये अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याबाबत काँग्रेस नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी मोठे विधान केले…
Read More