नीतिमत्ता नसलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे – आठवले

नीतिमत्ता नसलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे - आठवले

मुंबई : कानून वापसी तो घर वापसी अशी घोषणा करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. सरकार ने तिन्ही कृषी कायदे रद्द केले असताना शेतकरी नेत्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे.तरीही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना भडकवीणाऱ्या राकेश टिकेत सारख्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आठवले म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.कृषी कायदे रद्द केल्याने आता शेतकऱ्यांनी आंदोलन थांबविले पाहिजे. कायदे रद्द केल्यास आंदोलन थांबविणार असा शब्द शेतकरी नेत्यांनी दिला होता तो शब्द शेतकरी नेत्यांनी पाळला नाही. ही गद्दारी आहे.नीतिमत्ता नसलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली पाहिजे.

शेतकरी आंदोलन आता थांबविले पाहिजे. शेतकरी नेते आता शेतकऱ्यांना आंदोलनात डांबून त्यांना त्रास देत आहेत.दीर्घ काळ चाललेले आंदोलन कृषी कायदे रद्द झाल्याने बंद केले पाहिजे. राकेश टिकेत सारखे नेते शेतकऱ्यांना न्याय देण्याचा नावाने आंदोलनात ठेऊन अधिक त्रास वाढवीत आहेत.कानून वापसी तो घर वापसी हा शब्द राकेश टिकेत पाळत नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे रामदास आठवले म्हणाले.

Previous Post
काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार घरवापसी करतील - नवाब मलिक

काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार घरवापसी करतील – नवाब मलिक

Next Post
Eknath Shinde

एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे बांधकाम क्षेत्राला उभारी – एकनाथ शिंदे

Related Posts
mask

‘ग्राहकाने मास्क न घातल्यास, दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी’

मुंबई – ग्राहकाने दुकानात मास्क न वापरल्यास ग्राहकास फक्त रु. ५०० दंड परंतु संबंधित दुकान अथवा आस्थापनेला १०…
Read More
Nitish Kumar | एनडीएच्या बैठकीपूर्वी नितीश कुमारांच्या पक्षाने बिहारसाठी केली मोठी मागणी, NDAमध्ये तणाव वाढणार?

Nitish Kumar | एनडीएच्या बैठकीपूर्वी नितीश कुमारांच्या पक्षाने बिहारसाठी केली मोठी मागणी, NDAमध्ये तणाव वाढणार?

Nitish Kumar | 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि त्यासोबतच जल्लोषही सुरू झाला. बिहारला विशेष दर्जा मिळायला…
Read More
बंद झालेली महापौर चषक स्पर्धा पुढील दोन महिन्यात आयोजित करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

बंद झालेली महापौर चषक स्पर्धा पुढील दोन महिन्यात आयोजित करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Mangalprabhat Lodha : कोविड कालावधीत बंद पडलेला महापौर चषकचा विषय क्रीडा महाकुंभ स्पर्धेच्या निमित्ताने समोर आला आणि कॅबिनेट…
Read More