वसीम रिझवीला मोकळीक दिल्याने देशातील वातावरण बिघडतंय – मलिक

Nawab Malik

मुंबई – आंदोलन करणं हा अधिकार आहे परंतु आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल तर ते योग्य नाही. लोकांनी शांतता बाळगली पाहिजे असे सांगतानाच हिंसेला जबाबदार असणार्‍या लोकांवर सरकारच्यावतीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान वसीम रिझवी हे देशातील वातावरण बिघडेल असे कुठलेही विधाने अथवा लिखाण करणार नाही याची दक्षता केंद्रसरकारने घ्यावी असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.

त्रिपुरा येथे जी हिंसा झाली. वसीम रिझवी यांनी जे पुस्तक लिहिले आहे त्याविरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता. यादरम्यान नांदेड आणि इतर ठिकाणी हिंसा झाली असून या हिंसेचे कठोर शब्दात निंदा करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

आंदोलन व निषेध करणे हा लोकांचा अधिकार आहे परंतु चुकीच्या पध्दतीने आवाहन करणे व त्यावर नियंत्रण नसणे हे योग्य नाही. हिंसा होणार नाही ही जबाबदारी आयोजकांची असते मात्र काल जे घडले ते योग्य नाही. जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे परंतु लोकांनी शांतता ठेवावी असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

वसीम रिझवी हे गेल्या दोन – चार वर्षात या देशातील सलोखा कसा बिघडेल याबाबतची विधाने करत आहेत. पुस्तके लिहित आहेत. भावना दुखावेल असे कृत्य करत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. नियोजन पद्धतीने देशाचे वातावरण कसे बिघडेल असा प्रयत्न वसीम रिझवीच्या माध्यमातून सुरू आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

वसीम रिझवी हे सिया वक्फ बोर्डाचे चेअरमन असताना त्यांनी गैरव्यवहार केला होता. २०१६-१७ मध्ये युपी पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर सिया कम्युनिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले मात्र ते प्रकरण कोल्ड स्टोरेज मध्ये सीबीआयने ठेवले आहे आणि वसीम रिझवीला वादग्रस्त वक्तव्य करायला मोकळीक देण्यात आल्याने देशातील वातावरण बिघडत आहे त्यामुळे वसीम रिझवीवर तात्काळ कारवाई करा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

https://youtu.be/iLGbybjU9tc

Previous Post
Ajit Pawar

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले सातारा वैद्यकीय महाविद्यालय वर्षभरात सुरु होण्याचा मार्ग मोकळा

Next Post

विधानसभेतील बहुमत जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकार जाणं शक्य नाही – जयंत पाटील

Related Posts
ajit pawar

बुलढाण्यातील जि. प., पं. स. सदस्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच…
Read More
पापविनाश

पापविनाश मंदिर लातूरच्या इतिहासाचे सोनेरी पान …..!!

लातूर शहरात असलेल्या प्राचीन भूतनाथ मंदिरापासून जवळच पापविनाश हे भव्य तीर्थ आहे. या मंदिरात आढळलेला शिलालेख लातूरच्या संपन्न…
Read More
We will diligently provide services and facilities that enrich the lives of common people - Thackeray

सर्वसामान्यांच्या जीवनमानाला समृद्ध करणाऱ्या सेवा-सुविधा कसोशीने उपलब्ध करून देऊ – ठाकरे

नांदेड :- मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे(COVID) आव्हान परतवून लावण्यासाठी राज्यातील आरोग्याच्या सेवा-सुविधा भक्कम करणे आणि दुसऱ्या बाजुला राज्याच्या…
Read More