कांदा व बासमतीचे किमान निर्यात मूल्य काढल्याने शेतकऱ्यांना दिलासा, भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मानले पंतप्रधानांचे आभार

कांदा व बासमतीचे किमान निर्यात मूल्य काढल्याने शेतकऱ्यांना दिलासा, भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मानले पंतप्रधानांचे आभार

देशासह महाराष्ट्रातील लाखो कांदा व बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचे (Rice farmers) हित साधण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्यावर (एमईपी) असलेल्या अटी रद्द केल्या आहेत. यामुळे शेतकरी कोणत्याही प्रकारचे शुल्क न देता कांदा व बासमती तांदूळ निर्यात करू शकतील. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले आहेत.

महाराष्ट्रात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे तर कोंकण व पूर्व विदर्भात बासमती व इतर तांदळाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे.

कांदा उत्पादकांचे उत्पन्न वाढणार
केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त विदेशी व्यापार महासंचालक संतोष कुमार यांनी अधिसूचना जारी करून कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले किमान निर्यात मूल्य तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत रद्द केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. यापूर्वी काद्यावर ५५० डॉलर प्रति टन एमईपी आकरली जात होती.

बासमती तांदळाची निर्यात वाढेल
सोबतच केंद्र सरकारने बासमती तांदळावर लावलेला (Rice farmers) ९५० डॉलर प्रती टन निर्यात मूल्य देखील रद्द केला आहे. यामुळे विदर्भातील बासमती तांदूळ उत्पादकांना त्यांचा तांदूळ थेट विदेशी बाजारात विक्रीसाठी पाठविता येणार आहे. शेतकऱ्यांकडून बासमती तांदळाची निर्यात वाढणार असून धान उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“मला विरोधी पक्षातून पंतप्रधानपदाची ऑफर होती, पण…”, नितीन गडकरींचा गौप्यस्फोट

आगामी १०० वर्षाचा विचार करुन नवीन मध्यवर्ती इमारतीचे काम करा

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाच्या तरविंदरसिंह मारवाच्या मुसक्या आवळा

Previous Post
जर तुम्हीही या 4 गोष्टी खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची चूक करत असाल तर होऊ शकतं अपचन

जर तुम्हीही या 4 गोष्टी खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची चूक करत असाल तर होऊ शकतं अपचन

Next Post
आरक्षणविरोधी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

आरक्षणविरोधी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

Related Posts
nana patole

पटोलेंच्या विरोधातील प्रक्षोभक भाषेप्रकरणी भाजप नेत्याच्या अडचणी वाढल्या; चौकशीचे आदेश जारी

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल भाजपा नेते माजी कृषी मंत्री…
Read More

टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून (Maharashtra) बाहेर जात आहेत. नुकताच टाटा एअरबस (Tata Airbus Project)…
Read More
Manoj Jarange - माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आक्रमक झाले आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच…
Read More