वनजमीन घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

वनजमीन घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

Chandrashekhar Bawankule | नागपूरमधील वनजमीन घोटाळ्यात दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. वन विभागाच्या अधिकाऱ्याने संगनमताने कोट्यावधी रुपये किमतीच्या ४२ एकर वनजमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यानंतर याबाबत महसूलमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत.

मंत्रालयातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या दालनात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी विपीन इटणकर, वन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या घोटाळ्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक व्यक्तींना हाताशी धरून वनजमिनीचे पट्टे वाटप करत ही जमीन हडपण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. प्राथमिक माहितीनुसार, या जमिनीचे बाजारमूल्य कोट्यावधी रुपये असून, नियमांचा गैरवापर करत बनावट कागदपत्रांद्वारे हे वाटप करण्यात आले. या प्रकरणाने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाला भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार ठरवत, “दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असे स्पष्ट केले. त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी आणि वन विभागाला तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी स्थानिक व्यक्तींशी हातमिळवणी करत ४२ एकर वनजमिनीचे पट्टे तयार केले. यात नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय आहे. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारींमुळे हा प्रकार उघडकीस आला. ज्याची चौकशी आता स्वतंत्रपणे होणार आहे.

जिल्हाधिकारी आणि वन विभाग चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. तसेच, या प्रकरणात सामील असलेल्या स्थानिक व्यक्तींचीही चौकशी होणार असून महसूल मंत्र्यांनी या घोटाळ्याचा तळापर्यंत जाऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!

‘आम्ही तणाव वाढवत नाही, पण प्रत्युत्तर देणारच’; भारताचा स्पष्ट इशारा

दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

Previous Post
नालेसफाईची कामे बेभरवशाची; मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार कामाबाबत असमाधानी

नालेसफाईची कामे बेभरवशाची; मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार कामाबाबत असमाधानी

Next Post
राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी

Related Posts

हिवाळ्यात तहान नसली तरी प्यावे पाणी, नाहीतर उलट्यांपासून ते किडनी स्टोनपर्यंत होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

मानवी शरीरासाठी पाणी (Water) सर्वात महत्वाचे आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक नुकसानीला सामोरे जावे लागते. डॉक्टरांच्या मते, महिलांसाठी…
Read More
मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

Ashish Shelar – छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानाचा वध करताना जी वाघनखं (Wagh Nakhe) वापरली ती…
Read More

Men Will Be Men: विवाहित पुरुषांना दुसऱ्याची बायको सुंदर का वाटते?

तुम्ही हिंदीतील ही एक म्हण ऐकली असेलच की “शादी एक ऐसा लड्डू है जो खाये वो भी पछताए…
Read More