नवी दिल्ली | (india pakistan tension ) भारताकडून मिळालेल्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान पुरता निराश झाला असून, या नैराश्यातून तो सोशल मीडिया आणि डिजिटल मंचांवर अफवा पसरवण्याचं कारस्थान रचत आहे. खोटे व्हिडीओ, बनावट छायाचित्रं प्रसारित करून जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
सरकारनं नागरिकांना आवाहन केलं आहे की, सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तपासूनच शेअर करावी. विशेषतः भारतीय सैन्य अथवा सुरक्षेच्या बाबतीत चुकीची माहिती आढळल्यास तात्काळ तक्रार (india pakistan tension ) करावी.
खोट्या माहितीबाबत तक्रार करण्यासाठी सरकारनं खालील संपर्क माध्यमं उपलब्ध करून दिली आहेत:
व्हॉट्सॲप क्रमांक – 8799711259
ई-मेल आयडी – [email protected]
सरकारच्या PIB Fact Check सेवेच्या माध्यमातून अशा अफवांची पडताळणी करून नागरिकांपर्यंत सत्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!
‘आम्ही तणाव वाढवत नाही, पण प्रत्युत्तर देणारच’; भारताचा स्पष्ट इशारा
दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द