आतातरी राजू शेट्टी शरद पवारांच्या माडीवरुन खाली उतरणार की नाही, सदाभाऊंचा टोला

sadabhau khot - raju shetty

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले.

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

या तोकड्या मदतीवरून आता राज्याचे माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. लवकरच मी सरकार विरोधात किसान परिषद घेणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद घेणार आहे, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचा देखील समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली नाही तर जलसमाधी घेईन, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिली होता. यावर सदाभाऊंनी राजू शेट्टींना निशाण्यावर घेताना जलसमाधी नको किमान अंघोळ तरी करा, असा टोला लगावला. तर आतातरी शरद पवारांच्या माडीवरुन खाली उतरणार की नाही, असा खोचक सवालही विचारला.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=-oKz-KhwmvA&t=4s

Previous Post
sunil kedar

बचत गटांना शेळीपालनाचे शेड देण्यासाठी प्रस्ताव तयार करा – सुनिल केदार

Next Post
anil parab

डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर – अनिल परब

Related Posts
दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा- Sharad Pawar

दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा- Sharad Pawar

Sharad Pawar : दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी…
Read More
छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानूनंच प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राची आजवर वाटचाल...

छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानूनंच प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राची आजवर वाटचाल…

मुंबई  – शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन… राजमाता जिजाऊं माँसाहेबांना वंदन… स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना…
Read More
पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्यांविरोधात १०० एफआयआर दाखल; सहा जणांना अटक  

पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्यांविरोधात १०० एफआयआर दाखल; सहा जणांना अटक  

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या…
Read More