मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समीर वानखेडे यांना NCB मध्ये आणण्यात आलं. त्यानंतर ते सातत्याने बॉलिवूडच्या मागे लागले आहेत. कोरोना काळात जेव्हा अख्खं बॉलिवूड मालदिवमध्ये होतं तेव्हाच समीर वानखेडेही तिथे होते. त्यांचे कुटुंबीय होते. समीर वानखेडे तिथे खंडणी वसुलीसाठी गेले होते. समीर वानखेडे हे दुबईला का गेले होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांनी आर्यन खान विरोधात उभी केलेली केस हा बनाव आहे. जाणीवपूर्वक बॉलिवूडला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातं आहे’ असे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते.
या आरोपांना आता समीर वानखेडे यांनी अतिशय आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. ‘वारंवार गेल्या 15 दिवसांपासून माझी मृत आई, माझे निवृत्त वडील आणि बहिणीवर घाण शब्दांमध्ये टीका केली जात आहे. मी या गोष्टीचं खंडन करतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा कदाचित अधिकार असू शकतो. पण मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करतोय. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अँटीड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो’, अशी आक्रमक भूमिका समीर वानखेडे यांनी मांडली आहे.
‘ते दुबईत गेल्याचं बोलत आहे. मी या गोष्टीची घोर निंधा करतो. ही चुकीची माहिती आहे. जी तारीख ते सांगत आहेत, डिसेंबर महिन्यात मी त्यावेळी मुंबईत होतो. ते या गोष्टीचा तपास किंवा शहानिशा करु शकतात. हा चुकीचा आरोप आहे. त्यांनी ट्विट केलेले फोटो मुंबईचे आहेत. जे खंरय ते खरं आहे. विमानतळाकडून तुम्ही माहिती घेऊ शकतात. याशिवाय पासपोर्ट, विझा या सगळ्या गोष्टी लागतात. मग वेरिफाय करुन बघा’, असं आवाहन वानखेडे यांनी केलं.
हे देखील पहा
https://www.youtube.com/watch?v=3ugVGJoQwHo