‘ज्या लोकांनी जातीय वादाच विष पेरलं त्यांच्याशी युती म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली’

मुंबई – शिवसेना (shivsena) आणि संभाजी ब्रिगेडनं (sambhaji brigade) राज्यातील आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची काल घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray and Sambhaji Brigade president Manoj Akhre) यांनी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही वैचारिक युती असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं एक चांगलं समीकरण तयार होईल, अशी आशा आखरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, हिंदुत्व विरोधी संघटनेशी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दुसरीकडे याच मुद्द्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रात ज्या लोकांनी जातीय वादाच विष पेरलं त्यांच्याशी युती म्हणजे मा. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली. वारसा हा वास्तूंचा नसतो विचारांचा असतो पण सत्तेसाठी माती खाणाऱ्यांना काय कळणार? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.