Sealdah Kanchenjunga Express accident | प.बंगालमधील रेल्वे अपघातात नऊ जण ठार; मृतांच्या निकटवर्तीयांना मदत जाहीर

Sealdah Kanchenjunga Express accident | प.बंगालमधील रेल्वे अपघातात नऊ जण ठार; मृतांच्या निकटवर्तीयांना मदत जाहीर

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी स्थानकाजवळ काल सकाळी आगरतळा – सियालदाह कांचनगंगा एक्सप्रेस (Sealdah Kanchenjunga Express accident) मालगाडीला धडकल्यानं नऊ जण ठार आणि किमान ६० जण जखमी झाले. न्यू जलपाईगुडीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपाणी रेल्वेस्थानकानजिक दोन गाड्यामध्ये धडक झाली, त्यामुळे एक्सप्रेस गाडीचे मागील दोन डबे रुळावरून घसरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान सहायता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून जखमींना जलद बरे वाटावं यासाठी प्रार्थना करत असल्याचं आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल अपघात स्थळाला भेट दिली आणि मदत आणि बचावकार्याची पाहणी केली. तसंच रुग्णालयात जावून जखमींची चौकशी केली. मृतांच्या निकटवर्तीयांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत मंत्रालयाच्या वतीनं देणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी यांवेळी केली.

सिलीगुडीमध्ये काल सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात दिवसभर अडथळे आले. रेल्वेगाडी आगरतळाहून सियालदहला जात असताना सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात (Sealdah Kanchenjunga Express accident) झाला. त्यामुळे या मार्गावरील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या होत्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Assembly Elections | विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार! वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

Assembly Elections | विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार! वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

Next Post
Priyanka Gandhi | घराणेशाहीने पुन्हा काढले डोके वर; प्रियंका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार

Priyanka Gandhi | घराणेशाहीने पुन्हा काढले डोके वर; प्रियंका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार

Related Posts

जे गडकरींनी करून दाखवले ते शरद पवारांना कृषिमंत्री असताना का शक्य झाले नाही ?

सोलापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पुन्हा एकदा जेष्ठ नेते शरद पवार (Sharad…
Read More
लॉरेन्स बिश्नोई टोळीने पंजाबच्या तुरुंगातच रचला होता बाबा सिद्दीकींवरील गोळीबाराचा कट!

लॉरेन्स बिश्नोई टोळीने पंजाबच्या तुरुंगातच रचला होता बाबा सिद्दीकींवरील गोळीबाराचा कट!

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येप्रकरणी सातत्याने धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांच्या तपासात आणि…
Read More
सुरक्षित मातृत्व अभियान

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान नेमके काय आहे?

उद्दिष्ट: जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा व स्त्री रुग्णालय स्तरावर स्त्रीरोग तज्ञ तसेच रेडियोलॉजिस्ट यांच्यामार्फत…
Read More