किरीट सोमय्यांच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांची टीका म्हणाले,….

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकताच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

त्याआधी भाजप नेते मोहित कंभोज (Mohit Kambhoj) यांच्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला होता. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला होता सोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devandra fadanvis) यांच्या गाडीवर सुद्धा चप्पलफेक करण्यात आली होती.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत गृहसचिवांची भेट घेतली. 20 ते 25 मिनीट ही भेट झाली. यामध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर आम्ही चर्चा केली. ( Kirit Somaiya Met The Home Secretary ) त्यावर गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे. यावर आम्हाला जे आवश्यक वाटेल ती कारवाई आम्ही करणार आहोत अशी ग्वाही गृहसचिवांनी आम्हाला दिली अशी माहितीही सोमय्या यांनी दिली आहे.

दरम्यान, या घडामोडींबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी भाष्य केले आहे. अस्वस्थ असलेले लोक कोणते मार्ग खुले आहेत या खोलात जाणार आणि त्याचा फार विचार करण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवट ( Presidential reign )  लावण्याच्या चर्चा केल्या जातात, दमदाटी केली जाते पण त्याचा काही परिणाम होत नाही. निवडणुका लागल्या तर निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितलं आहे. त्यामुळे कोणी त्या टोकाला जाईल असं वाटत नाही,” असं शरद पवार किरीट सोमय्यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना म्हणाले.