रस्त्याचे प्रश्न प्राधान्याने सोडणार, आणखी काही कामे असतील तर सांगा – शंकरराव गडाख

shankarrao gadakh

सोनई : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना दळणवळणासाठी रस्ते प्रमुख माध्यम आहेत. त्यामुळे माका, पाचुंदासह नेवासे तालुक्यात विविध गावांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. रस्त्याच्या विकासातूनच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. या परिसरातील आणखी काही कामे असतील, तर सांगा, ती प्राधान्याने केली जातील, असे प्रदिपादन राज्याचे मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

नेवासे तालुक्यातील माका ते पाचुंदा रस्त्याच्या २ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री गडाख यांच्या हस्ते माका येथे करण्यात आला. त्याप्रसंगी गडाख बोलत होते. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या भीषण दुर्घटनेत माका, पाचुंदा, तेलकुडगाव येथील तीघांचा दुदैवी मृत्यू झाला होता. मंत्री गडाखांनी विशेष प्रयत्न करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाखांची मदत उपलब्ध केली होती. त्या निधीच्या धनादेश वाटप गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव पांढरे, एकनाथ जगताप, सरपंच नाथाजी घुले, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ म्हस्के, सुदाम घुले, रमेश कराळे, देविदास भुजबळ, साहेबराव होंडे, माणिक होंडे, एकनाथ भुजबळ, सुभाष गाडे, भरत होंडे, अमित रासने, सुखदेव होंडे, भानुदास म्हस्के यादव शिंदे, नारायण माने, बबन भानगुडे, अण्णासाहेब केदार, विधिज्ञ गोकुळ भताने, जनार्दन घुले, सलिम शेख, रावसाहेब गायके, राजू पालवे आदी उपस्थित होते.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

Previous Post
annabhau sathe

‘अण्णाभाऊ साठे सभागृह येथील लाऊडस्पिकर्स सिस्टीम चोरणाऱ्यांना तत्काळ अटक करा’

Next Post
rajesh tope

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा संसर्ग चार पट जास्त – राजेश टोपे

Related Posts
कोथरूडची उमेदवारी मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हातोबाच्या चरणी लीन, कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोथरूडची उमेदवारी मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हातोबाच्या चरणी लीन, कार्यकर्त्यांचा जल्लोष

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे…
Read More
Gautam Gambhir Coach | गौतम गंभीर प्रशिक्षक होताच बदलेल टीम इंडिया, बीसीसीआयने स्वीकारल्या 'अटी'

Gautam Gambhir Coach | गौतम गंभीर प्रशिक्षक होताच बदलेल टीम इंडिया, बीसीसीआयने स्वीकारल्या ‘अटी’

गौतम गंभीर ( Gautam Gambhir Coach) लवकरच टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ स्वीकारणार आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार,…
Read More
ॲड. यशोमती ठाकूर

आपली मूलं परदेशात पाठवून इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवायची, हे डॉक्टरला शोभत नाही – पालकमंत्री

मुंबई – आपली मूलं परदेशात पाठवायची व इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवायची, असं करणं एका डॉक्टरला ( Doctor )…
Read More