जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून छत्रपती शिवरायांची सुटका झाली पाहिजे -श्रीपाल सबनीस

नागपूर – राज्यात सध्या राजकीय पक्षांमध्ये भोंगे, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्व आदी मुद्यांवरून वातावरण तापले आहे. यातच  आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस(Shreepal Sabnis) यांनी केलेली काही वक्तव्ये चांगलीच चर्चेत  येण्याची शक्यता आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी (Racist) विद्वानांच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी. राजकारणात भ्रष्टाचार (Corruption)आहे, पण त्याहीपेक्षा महाराजांना जातीत बांधू पाहणाऱ्या या विद्वानांची विद्वत्ता भ्रष्ट झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य जाती-धर्मापलीकडचे होते, असे मत सबनीस यांनी व्यक्त केले.

शिवाजी महाराजांच्या इतिहासावरुन सुरु असलेला वाद आणि त्यांच्या ‘छत्रपती शिवराय : ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद आणि विवेकवादी भूमिका’(Discretionary role) या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपुरात पत्रकारांशी (Media) संवाद साधला. यावेळी छत्रपती शिवरायांबद्दल विकृत (Distorted)इतिहास लिहिण्याचा प्रघात निंदनीय असून त्या सर्वांचा इतिहास विवेकवादाने खोडल्याचे सबनीस यावेळी म्हणाले.

ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास( Samarth Ramdas) व दादोजी कोंडदेव (Dadoji Kondadev) यांना महाराजांच्या गुरुपदी लादले. तर महाराजांचे शत्रू मुसलमान असल्याचा भास निर्माण करताना अफजलखानाच्या वधाचे उदाहरण दिले, पण अफजलखानाचा वध महाराजांनी स्वराज्याचे शत्रु म्हणून केला, हे या विद्वानांना ठाऊक नाही, असं यावेळी ते म्हणाले. तर दुसरीकडे ब्राह्मणेत्तर (Non-Brahmin) विद्वानांनी महाराजांचे शत्रू ब्राह्मण असल्याचा भास निर्माण करताना कृष्णाजी कुळकर्णी यांना महाराजांनी ठार केल्याचे उदाहरण दिले, पण कृष्णाजी कुळकर्णी यांनाही स्वराज्याचे शत्रू म्हणून महाराजांनी मारले हे ब्राह्मणेत्तर विद्वानांना ठाऊक नाही का?,” असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“महाराज हे हिंदुत्त्ववादी म्हणवण्याचा जसा घाट घातला जात आहे, तसंच फुले, शाहू, आंबेडकरवादी असल्याचे सांगून त्यांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून महाराजांच्या कर्तृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित समाजातील काही विद्वानांकडून केला जात आहे. या जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून महाराजांची सुटका व्हावी,” असे सबनीस म्हणाले.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.