‘वंदे भारत’ रेल्वेला सोलापुरात थांबा द्यावा, सुभाष देशमुख यांची रेल्वेमंत्री दानवेंकडे मागणी

deshmukh - danave

सोलापूर : देशातील सेमी हायस्पीड चालणारी गाडी म्हणून वंदे भारत एक्स्प्रेस प्रसिद्ध आहे. जलद प्रवास करणाऱ्या या रेल्वेचा लाभ सोलापूरच्या विकासात व्हावा. वंदे भारत सेमी हायस्पीड रेल्वेला सोलापुरात थांबा द्यावा, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

देशमुख यांनी दिल्ली येथे ना. दानवे यांची भेट घेतली आणि सोलापूर जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध कामाविषयी निवेदन दिले. सोलापूरकरांचा मुंबई आणि पुण्याचा संपर्क अधिक आहे. त्यामुळे वंदे भारत हायस्पीड रेल्वे सेवा सुरु होत आहे. ताशी 140 कि.मी वेगाने धावणाऱ्या या रेल्वेमुळे सोलापूरच्या विकासात भर पडणार आहे.

या रेल्वेला सोलापूरला थांबा द्यावा, सोलापूर ते टिकेकरवाडी या लोहमार्ग दरम्यान आसर चौक येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे रुंदीकरण व नूतनीकरण करावे, होटगी स्टेशन स्थानकावरील ब्रिटीशकालीन पूल वाहतूकीस खुला करावा, ग्रामीण भागातील लोकांना आरक्षण तिकिट काढण्यासाठी शहरात यावे लागते. त्यांची सोय करण्यासाठी होटगी स्टेशन स्थानकावर तिकीट आरक्षण कार्यालय चालू सुरू करावे, सोलापूर रेल्वे स्थानक येथे सौर ऊर्जा प्रकल्प बसवावा, होटगी स्टेशन येथे रेल्वेच्या खुल्या जागेत बांबू लागवड करण्यासाठी परवानगी मिळावी, पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील 438/4/5 दरम्यान रेल्वे पूल खालून भुयारी मार्ग करून मिळावा यासह विविध मागण्या आ. देशमुख यांनी दानवे यांच्याकडे केल्या.

यावेळी दानवे यांनी वरील सर्व मागण्यांबाबत विचार केला जाईल आणि वंदे भारत रेल्वेला सोलापूरला थांबा देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले

हे वाचलंत का ? 

Previous Post
darang

अतिक्रमण हटवण्याच्या मोहीमे दरम्यान संघर्ष; दोन जणांचा मृत्यू

Next Post
ncp leader

आयत्या नेत्यांच्या जोरावर राष्ट्रवादीला पडत आहेत महापौर पदाचे स्वप्न…

Related Posts
Narendra Modi - Hiraben Modi

100 व्या वाढदिवसानिमित्त रस्त्याला PM मोदींच्या आईचे नाव देण्यात येणार

वडनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) त्यांच्या गुजरात दौऱ्यात अनेकदा त्यांच्या आईला भेटताना दिसतात. या…
Read More
nawab malik - bjp

भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला…, भाजप आमदाराचा टोला

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी…
Read More
वक्फ सुधारणा विधेयकाला पाठींबा दिल्यानंतर नितीश कुमार यांना धक्का, जवळच्या नेत्याचा राजीनामा

वक्फ सुधारणा विधेयकाला पाठींबा दिल्यानंतर नितीश कुमार यांना धक्का, जवळच्या नेत्याचा राजीनामा

Nitish Kumar | वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले. आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आहे. एनडीएचा मित्रपक्ष…
Read More