साहित्यिक व पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह, कुबेरांवरील शाईफेकीचा तीव्र निषेध – सुळे

supriya sule

नाशिक – नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले.

रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक व संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आली. साहित्यिक व पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह आहेत. या घटनेचा तीव्र निषेध. असं म्हणत सुळे यांनी आपली नाराजी दर्शविली आहे.

दुसऱ्या बाजूला जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, विचारांचा प्रतिवाद विचारांनीच करावा लागेल, शाई फेकून नाही. गिरीश कुबेर यांच्यावरील शाईफेकीचा निषेध … असं म्हणत वागळे यांनी मत व्यक्त केले आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत.काही चुकीचे लिहिले असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे.परंतू साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. संमेलन ही अभिव्यक्तीची जागा आहे. चुकीच्या विचारांना तर्क आणि पुराव्यांनी उत्तर दिले पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

Previous Post
nikhil wagale

विचारांचा प्रतिवाद विचारांनीच करावा लागेल, शाई फेकून नाही…गिरीश कुबेर यांच्यावरील शाईफेकीचा निषेध – वागळे 

Next Post
dilip walase patil - girish kuber

‘तोंडाला काळं फासण्याची घटना लोकशाहीवादी पुरोगामी महाराष्ट्रासाठी अस्वस्थ करणारी’

Related Posts
जेव्हा एखादा 'मदारी' माकडांसह रस्त्यावर येतो तेव्हाही मोठी गर्दी होते - मार्कंडेय काटजू 

जेव्हा एखादा ‘मदारी’ माकडांसह रस्त्यावर येतो तेव्हाही मोठी गर्दी होते – मार्कंडेय काटजू 

Bharat Jodo :  सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी ‘भारत जोडो यात्रे’च्या…
Read More
MLA_Nitesh_Rane

गणेशोत्सवासाठी भविष्यात विमानाचीही सोय करू – नितेश राणे

मुंबई – कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्ष राज्यासह देशावर करोनाचे संकट होते. दोन वर्षांपासून मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav)…
Read More
‘अर्धा वाटा’ सिनेमातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र

‘अर्धा वाटा’ सिनेमातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र

Prasad Oak | रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे…
Read More