समीर वानखेडेंविरोधातील बदनामीसत्र चीड आणणारं, अंजली दमानिया यांचा वानखेडेंना पाठिंबा

समीर वानखेडेंविरोधातील बदनामीसत्र चीड आणणारं, अंजली दमानिया यांचा वानखेडेंना पाठिंबा

मुंबई – क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर काही जणांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री  नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणावरून सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे. आता या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाष्य करत वानखेडे यांना पाठींबा दिला आहे.

अंजली दमानिया  म्हणाल्या, नवाब मलिक यांच्यासारख्या माणसांनी त्यांच्याविरोधात जे बदनामीसत्र चालवलं आहे ते एकदम चीड आणणारं आहे. वानखेडे यांचं काम हे सरळ आणि स्पष्ट असल्याचं ऐकलंय. मलिक यांच्याकडून वानखेडे यांची प्रतिमा आणि विश्वासर्हता कमी करण्यासाठी खटाटोप सुरु आहे. अशा वेळी समीर वानखेडे यांच्या बाजूनं सर्व सहकारी आणि अधिकाऱ्यांनी उभं राहायला हवं.

आज जर त्यांच्यासोबत कुणी उभं राहिलं नाही तर तुम्हीदेखील तुमचं कर्तव्य व्यवस्थित पाडू शकणार नाहीत. याच नवाब मलिक यांनी माझ्यावरदेखील दररोज खोटे आरोप केले होते. पण त्यातून काहीच सिद्ध झालं नाही. आता हेच नवाब मलिक स्वत:च्या जायवाच्या अटकेबद्दल वैयक्तिक स्कोर सेटल करत आहेत. या सगळ्या कटकारस्थानाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत वानखेडे आणि एनसीबीच्या पाठीशी उभं रहावं, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o&t=1s

Previous Post
आरोग्य विभाग पदभरती परिक्षेबाबत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बाबत खुलासा करण्याची युवासेनेची मागणी

आरोग्य विभाग पदभरती परिक्षेबाबत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बाबत खुलासा करण्याची युवासेनेची मागणी

Next Post
उत्तर प्रदेशच्या निवडणूकित आरपीआय ब्राह्मण समाजाला सोबत घेणार - रामदास आठवले

उत्तर प्रदेशच्या निवडणूकित आरपीआय ब्राह्मण समाजाला सोबत घेणार – रामदास आठवले

Related Posts
India Vs Pakistan | पुन्हा एकदा भारताचा सामना पाकिस्तानशी होणार, या दिवशी दोन्ही संघ आमनेसामने येणार

India Vs Pakistan | पुन्हा एकदा भारताचा सामना पाकिस्तानशी होणार, या दिवशी दोन्ही संघ आमनेसामने येणार

भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सामन्याची दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच, पुरुषांच्या…
Read More
car

जर तुम्हाला कारमध्ये ही समस्या जाणवू लागली तर लगेचच कार विकून टाका 

नवी दिल्ली  : दिल्ली-NCR मध्ये पेट्रोल कारची नोंदणी 15 वर्षांसाठी वैध आहे आणि डिझेल कारची नोंदणी 10 वर्षांसाठी…
Read More
Ashish Shelar | महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे,आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं

Ashish Shelar | महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे,आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं

Ashish Shelar | मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत आहे. त्यामुळे पालिकेने ७५ टक्के नालेसफाई कामांबाबत केलेले…
Read More