परमवीर यांंना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव – आशिष शेलार

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब असतील, पळुन गेले असतील तर गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

परमबीर सिंग राज्यातून पळून गेला कसा? याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मंत्री मलिक यांना दिलं आहे. परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंग पळून गेला मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना? रेशनकार्ड, आधार कार्ड हे इथलेच होते ना? महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करीत आहे.

ते पळून गेले असतील तर ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय.परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. ते जर सापडले तर सरकारचे पित्तळ उघडे पडेल, त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, हा.एक डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला.

Previous Post
anil deshmukh

दोन महिने पळाले अखेर ‘ईडी’ने गाठले, अनिल देशमुखांना अटक

Next Post

ग्रामसभेत होणार आता मतदारयादीचे वाचन

Related Posts
‘मेरी माटी मेरा देश’ अभियान लोकसहभागातून यशस्वी करावं; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

‘मेरी माटी मेरा देश’ अभियान लोकसहभागातून यशस्वी करावं; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

Meri Mati Mera Desh : स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान सुरु…
Read More
Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मोहोळांच्या…
Read More
एकेकाळी प्रेयसीकडून पैसे घेऊन जगायचा, आज हा अभिनेता आहे अमाप संपत्तीचा मालक

एकेकाळी प्रेयसीकडून पैसे घेऊन जगायचा, आज हा अभिनेता आहे अमाप संपत्तीचा मालक

Paresh Rawal | अनेक लोक जीवनात पुढे जाण्यासाठी जोखीम घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका…
Read More