कोरेगाव भीमा हिंसाचाराला फडणवीस सरकारच जबाबदार, शरद पवारांचा गंभीर आरोप

मुंबई – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Case)  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी ‘भीमा कोरोगाव हिंसाचाराला भाजप सरकार जबाबदार होतं. हिंसा नियंत्रण करता आले असते पण तसे केले गेले नाही’ असा गंभीर आरोप शरद पवार यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis ) यांच्यावर केला आहे.न्या. जे. एन. पटेल आयोगाकडून कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू आहे.

चौकशी दरम्यान, विचारण्यात आले की,कोरोगाव भीमा हिंसाचाराला तत्कालीन राज्य सरकार जबाबदार होतं का? या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवार म्हणाले,  माझ्या मते हे पोलिसाचं अपयश होत. हे थांबवण्याची राज्य सरकारची राजकीय इच्छाशक्ती नव्हती. सोशल मीडियावरील चुकीची माहिती त्यांनी दुर्लक्षित केली. त्यामुळे समाजविघातक तत्वांचा या मागील हेतू साध्य झाला.