संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही; जयंत पाटलांचा अजब दावा

संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही; जयंत पाटलांचा अजब दावा

सिंधुदुर्ग – मंत्री छगन भुजबळ हे निर्दोष झालेच की आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही… ते निर्दोष होतीलच परंतु माणसाला मानसिक छळ करण्याचे काम…आणि सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र केंद्रसरकारच्या एजन्सीमार्फत काही लोक करत आहे. लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब आणि वापर होतोय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत केला.

कुठलंही काम हे मेरीटने होणार यामध्ये मराठी आणि अमराठी असल्याचा विषय येत नाही. यापूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना २८ महिने ईडीने तुरुंगात ठेवले ते मराठीच होते ना… मेरीटनेच सगळे होणार आणि आघाडी सरकार कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आमचं सरकार निष्पक्षपातीपणाने काम करतंय…जी कागदपत्रे पुढे येत आहेत ती धक्कादायक आहे. हे धक्कादायक असल्यानेच एनसीबीने दिल्लीहून चौकशी समितीने त्यांची चौकशी केली. त्यामुळे त्यांचे दाखले हा विषय नसला तरी त्यापेक्षा खंडणीचा जो प्रकार आहे हा अगोदर कधी प्रकार कधी घडला नाही आताच्या राजवटीत मात्र ते सुरु आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

समस्या काय आहे की, मी पक्षाच्या कामाचा आढावा घेतोय…

कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय… त्यांना बुथ कमिट्या करा… यंत्रणा उभ्या करा असे सांगतानाच हे पाहण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ असे सांगत आहेत त्यामुळे लोकं या वाक्याला खूप हसतात… आता तुम्हीही हसलात… हे जे वाक्य आहे त्याला पर्यायी वाक्य शोधतोय परंतु ते मिळत नाही म्हणून ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य वापरत आहे असे सांगताच पुन्हा एकदा पत्रकारांमध्ये हशा पिकला…

जिल्हा परिषदेत आघाडी जर झाली तर आघाडीची चर्चा करण्याअगोदरच स्वबळाची भाषा बोलणं म्हणजे थोडंसं आघाडी करायचीच नाही अशा भावनेतून बोलण्यासारखं होतं तशी आमची भावना नाही.

आघाडीला आमचं प्राधान्य आहे. स्वबळाचा नारा आज द्यायची गरज नाही. सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सामंजस्याने, चांगल्या पद्धतीने या जिल्हा परिषदेत काम करतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o&t=1s

Previous Post
समीर वानखेडे एक प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करत होता - नवाब मलिक

समीर वानखेडे एक प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करत होता – नवाब मलिक

Next Post
ठाकरे सरकारने महाराजांच्या स्मारकाला बंदी वासात टाकलंय का? - मेटे

ठाकरे सरकारने महाराजांच्या स्मारकाला बंदी वासात टाकलंय का? – मेटे

Related Posts
Chhagan Bhujbal

राज्यपालांनी वादविवाद होईल असे वक्तव्य टाळावे; छगन भुजबळ यांचा सल्ला 

नाशिक :- आदरणीय राज्यपाल (Governor) यांनी वाद होईल असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे. राज्यपालांचे मुंबई (Mumbai) बद्दल हे…
Read More
Bhushan Gokhale | खेळाडूंच्या यशामध्ये पालकांचा सिंहाचा वाटा

Bhushan Gokhale | खेळाडूंच्या यशामध्ये पालकांचा सिंहाचा वाटा

Bhushan Gokhale | खेळाडूंच्या यशामध्ये त्यांच्या गुरूंबरोबरच त्यांच्या पालकांचाही सिंहाचा वाटा असतो. विशेषतः प्रत्येक पाल्याची आई त्याला जसे…
Read More
sharad pawar

पवारसाहेबांवर टिका- टिप्पणी करण्याची निलेश राणे याची लायकी नाही – महेश तपासे

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र भाजपनेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा…
Read More