…तर शिवराज राक्षेवर केलेली कारवाई मागे घेणार; महाराष्ट्र केसरीच्या आयोजकांचं आश्वासन

...तर शिवराज राक्षेवर केलेली कारवाई मागे घेणार; महाराष्ट्र केसरीच्या आयोजकांचं आश्वासन

Shivraj Rakshe | अहिल्यानगर येथे 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादग्रस्त निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. गादी विभागातील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या कुस्तीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पंच नितीश कबालिये यांच्यावर कारवाई करत त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली.

या निर्णयानंतर महाराष्ट्र केसरीचे आयोजक संदीप भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली की, 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे अशी कुस्ती झाली होती. या सामन्यात पंचाच्या निर्णयाने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंधरा दिवस सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला. आम्ही या सगळ्याला लक्षात घेऊन विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या कुस्ती सामन्याची चौकशी करण्याचे आदेश त्यांना दिले. 28 फेब्रुवारीला या समितीचा अहवाल मिळाला.

मागच्या आठवड्यामध्ये कुस्ती संघाची ऑनलाईन बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये त्या पंचांची चूक आहे असे अहवालात निदर्शनास आले. त्यामुळे बैठकीमध्ये आम्ही पंच यांच्यावर तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली. महाराष्ट्रातील कुस्तीच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई, पण एकदा निकाल दिल्यानंतर तो बदलता येत नाही. यामध्ये पृथ्वीराज मोहोळची काही चूक नाही. पण पंचानी काय निर्णय द्यावा हा त्यांचा निर्णय असतो. महेंद्र गायकवाड यांनी निलंबन कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिलं होतं. त्याची कारवाई आम्ही मागे घेतली.

परंतु शिवराज राक्षे ( Shivraj Rakshe) यांनी अशा प्रकारचे पत्र दिलं नाही. त्यामुळे त्याच्यावरील कारवाई मागे घेता येणार नाही. जर त्यांनी पत्र दिलं आणि तर आम्ही निश्चितच सगळे सदस्य बसून कारवाई मागे घेण्याचा प्रयत्न करू, असे आस्वासन भोंडवे यांनी दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’च्या माध्यमातून तीन बड्या नेत्यांची नवी आघाडी

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेनेचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला?

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मोदींना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

Previous Post
शिवराज राक्षेने लाथ मारलेले महाराष्ट्र केसरीचे पंच निलंबित, कुस्तीगीर संघटनेची कारवाई

शिवराज राक्षेने लाथ मारलेले महाराष्ट्र केसरीचे पंच निलंबित, कुस्तीगीर संघटनेची कारवाई

Next Post
नागपूरमध्ये बुधवारी १६ एप्रिल रोजी काँग्रेसचा ‘सद्भावना शांती मार्च’

नागपूरमध्ये बुधवारी १६ एप्रिल रोजी काँग्रेसचा ‘सद्भावना शांती मार्च’

Related Posts
राजकीय गणित साधण्यासाठी पवारसाहेब सातत्याने खोटं बोलत असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं - मनसे

राजकीय गणित साधण्यासाठी पवारसाहेब सातत्याने खोटं बोलत असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं – मनसे

पुणे –   ठाण्यात पार पडलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी (raj Thackeray) राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. राज ठाकरे आणि…
Read More
समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Eknath Shinde | राज्यात गेली अडीच वर्ष महायुती सरकारने विकास आणि लोक कल्याणकारी योजनांची सांगड घालत काम केल्याने…
Read More
Nana_Patole

महाविकास आघाडी सरकार सर्व समाजाला न्याय देणारे; नाना पटोले यांचा दावा

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा आजचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला चालना देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे,…
Read More