“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, दिलेली आश्वासने पूर्ण करणार”

"शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, दिलेली आश्वासने पूर्ण करणार"

Anand Paranjape | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने महाराष्ट्रातील बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे परंतु कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे अशाप्रकारची चर्चा होत असून हे अत्यंत चुकीचे असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे  (Anand Paranjape)यांनी केला आहे आहे.

गेले दहा दिवस अजित पवार हे राज्याचे अर्थ व वित्त नियोजन मंत्री म्हणून प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांसोबत, राज्यमंत्र्यांसोबत, सचिव, उपसचिव यांच्याशी बैठका घेऊन चर्चा करत आहेत. ज्यावेळी अजित पवार मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडतील त्यावेळी पुढच्या वर्षीचा फायनान्सियल आऊटलेट काय असला पाहिजे. सन २४-२५ या मागील वर्षात झालेल्या घोषणा आणि त्याबाबत झालेले खर्चाचे नियोजन त्यात अधिक खर्च झालेला नाही याचा अत्यंत सूक्ष्मपणे प्रत्येक खात्याचा आढावा घेत आहेत असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

मार्चमध्ये जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळी महायुतीने आपल्या वचननाम्यामध्ये केलेल्या सर्व घोषणा पूर्ण झालेल्या पहायला मिळतील. बळीराजा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही अशाप्रकारच्या बातम्या माध्यमप्रतिनिधिंनी चालवू नये असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला आहे.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या इतर अनेक प्रश्नांना आनंद परांजपे यांनी उत्तरे दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

कचरा काढून टाकला पाहिजे, सैफवर खरंच चाकूने वार झाले की अभिनय करत होता – Nitesh Rane

श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करण्याऐवजी बाळासाहेबांना भारतरत्न द्या – Sanjay Raut

दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार; 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार

Previous Post
आबा बागुल यांच्या मुलाची मुजोरी; दुचाकीस्वाराला मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी ?

आबा बागुल यांच्या मुलाची मुजोरी; दुचाकीस्वाराला मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी ?

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा - Ajit Pawar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा – Ajit Pawar

Related Posts
chaitanya kulkarni

15 वर्षांच्या छोट्या सोलापुरी पत्रकाराचा नादखुळा

सोलापूर :  सोशल मीडिया कोणालाही रातोरात सुपरस्टार बनवून शकतं. यूट्यूब हे असं माध्यम आहे ज्यातून अगदी छोट्या गावातील…
Read More
पथनाट्य - शंकर-पार्वती

पथनाट्यात शंकर-पार्वतीची भूमिका करणाऱ्या व्यक्तींना अटक, काय आहे हे संपूर्ण प्रकरण

नागाव – काली चित्रपटाच्या पोस्टरवरून देशभरात संताप व्यक्त होत असताना, आसाममधील नागावमध्ये भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या रूपात…
Read More
Chandrayaan 3: 'उस चांद के मिट्टी पर हमारे....!' अमिताभ यांची कविता वाचून येईल डोळ्यात पाणी!

Chandrayaan 3: ‘उस चांद के मिट्टी पर हमारे….!’ अमिताभ यांची कविता वाचून येईल डोळ्यात पाणी!

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेच्या चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) यशस्वी लँडिंगसाठी, देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. चांद्रयान 3…
Read More