राज्यात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे काहीही घडू शकतं; दत्तात्रय भरणे याचं सूचक वक्तव्य

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत (BJP) शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान,राज्यात सध्या राजकीय उलथा-पालथीची चिन्ह असताना मविआ (MVA) सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी एक मोठं विधान केलं आहे. राज्यात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे काहीही घडू शकतं, असं दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत.   इंदापूर (Indapur) शहरात बोलताना भरणे यांनी हे विधान केलं.

राज्यात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू आहेत, त्यामुळे काहीही घडू शकते. दोन वर्षे कोरोनाचा (CORONA) काळ होता आता. त्यानंतर काही चांगली कामं करता येतील असं वाटलं होतं. मात्र आता काहीही घडू शकतं. सरकार राहिलं काय अन् नाही राहिलं काय शेवटी तुमच्या तालुक्याचा आमदार मीच आहे!, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.