तीन पक्षांचे सरकार असले तरी आम्ही एकच, आघाडीत कोणताही वाद नाही – भुजबळ

तीन पक्षांचे सरकार असले तरी आम्ही एकच, आघाडीत कोणताही वाद नाही - भुजबळ

चंद्रपूर : तीन पक्षांचे सरकार असले तरी आम्ही एक आहोत महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. जेंव्हा भिन्न मत असतात तेव्हा आम्ही एकत्रित बसुन चर्चा करून निर्णय घेत असतो. आगामी काळात येणाऱ्या निवडणूका एकत्रित लढण्याचा सर्वांचा मानस आहे मात्र यासाठी आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ. असं राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटल आहे.

चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यामार्फत कृतज्ञता सोहळा आयोजित केला होत त्यावेळी ते बोलत होते.

ओबीसींच्या आरक्षणासंबंधीत प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून महाविकास आघाडीही ओबीसी आरक्षणासाठी प्रत्येक आघाडीवर लढत राहणार .आम्ही फुले-शाहू-आंबेडकर यांचे अनुयायी आहोत त्यामुळे ओबीसी आरक्षणा संदर्भात आम्ही लढतच राहणार आहोत, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत.

तर, आज काही पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी ओबीसींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळेच ओबीसी समाजाला आरक्षणाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी विदर्भात आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाचे स्थगित झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी आम्ही अध्यादेश काढला आहे. असं यावेळी छगन भुजबळ म्हणाले.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=DBZ9rSr33XU

Previous Post
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय

Next Post
डेलकर कुटुंबीयांनी केला होता शिवरायांच्या पुतळ्यास विरोध; आता भाजप उभारणार भव्य अश्वारूढ पुतळा 

डेलकर कुटुंबीयांनी केला होता शिवरायांच्या पुतळ्यास विरोध; आता भाजप उभारणार भव्य अश्वारूढ पुतळा 

Related Posts
चिखली परिसर भविष्यातील उद्योगनगरीचा ‘हार्ट ऑफ सिटी’, भाजपा आमदार महेश लांडगेंची भावना

चिखली परिसर भविष्यातील उद्योगनगरीचा ‘हार्ट ऑफ सिटी’, भाजपा आमदार महेश लांडगेंची भावना

Mahesh Landge | पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या चिखली परिसराचा खऱ्या अर्थाने कायापालट 2014 नंतर सुरू…
Read More

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Mumbai – राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर…
Read More
devendra fadanvis

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार थांबविले

मुंबई – शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची…
Read More