उन्हाळ्यात पायाच्या तळव्यांची होते जळजळ, अशावेळी ‘हा’ एकच घरगुती उपाय ठरु शकतो उपयोगी

उन्हाळ्यात (Summer) अनेकदा पायांच्या तळव्यांत जळजळ होते. ही समस्या मधुमेहाच्या रुग्णांना विशेषतः मासिक पाळीदरम्यान महिलांना होते. अनेकांच्या पोटात उष्णता किंवा खूप औषध घेतल्यानेही त्रास होतो. जर तुम्हीही पायांच्या तळव्यांची जळजळ होण्याशी देखील संघर्ष करत असाल तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यासाठी तुम्ही फक्त हे घरगुती उपाय करा.

पायांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफडीला सर्वोत्तम मानले गेले आहे. ते कसे कार्य करते, वापरण्याची पद्धत आणि फायदे यांबद्दल जाणून घ्या …

पायांमध्ये जळजळ होऊ नये म्हणून कोरफडीचा गर सर्वोत्तम मानला जातो. कोरफड थंड मानली जाते. यामध्ये आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म तळव्यांच्या जळजळीला शांत करतात. तसेच, यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म पायांशी संबंधित अनेक समस्या कायमचे दूर करतात. यासोबतच त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतात. याशिवाय कोरफडीचे हायड्रेटिंग गुणधर्म त्वचेतील आर्द्रता पुनर्संचयित करतात. त्याच वेळी, कोरडी त्वचा आणि पाय जळजळ होण्याची समस्या दूर करते.

पायाच्या तळव्यात जळजळ होत असेल तर अशा प्रकारे कोरफडीचा वापर करा-

तळव्यावर कोरफड 2 मिनिटे चोळा
पायाच्या तळव्यात जळजळ होत असेल तर सर्वप्रथम तळवा स्वच्छ करा, त्यानंतर कोरफड आणि लिंबू मिक्स करून २ मिनिटे घासून घ्या. तुम्हाला दिसेल की तुमच्या पायाची जळजळ काही वेळातच बरी होईल. तुम्ही ते लावून रात्रभर ठेवू शकता. पायाची जळजळ आपोआप कमी झाली आहे असे तुम्हाला वाटेल.

कोरफड आणि चंदनाची पेस्ट लावा
पायाच्या तळव्यामध्ये जास्त जळजळ होत असेल तर कोरफड आणि चंदनाची पेस्ट देखील लावू शकता. कोरफढ आणि चंदन खूप थंड असतात. दोन्ही चांगले मिसळून पेस्ट बनवा आणि नंतर लावा. काही वेळ तळव्यांवर ही पेस्ट तशीर राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. जर तुम्ही असे रोज केले तर तुमच्या पायाच्या तळव्याची जळजळ पूर्णपणे नाहीशी होईल.