हा देश ‘हम दो हमारे दो’ असे चारजण मिळून चालवतात, पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल

पुणे : केंद्रातील भाजपा सरकारने देश विकायला काढला आहे. रेल्वे, विमा कंपन्या, बँका, बीएसएनएल सर्वकाही विकायला काढले आहे. शेतकरी, कामगार यांना संपवायला निघाले आहेत. हा देश ‘हम दो’ हमारे दो’ असे चारजण मिळून चालवतात हे जनतेला आता समजले आहे. केंद्रातील सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने जनजागृती अभियान हाती घेतले आहे. काँग्रेस सामान्य माणसाला केंद्रीभूत माणून विकास केला पण आत्ताचे केंद्रातील सरकार सर्वकाही विकून टाकत आहे. असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, उपाध्यक्ष देविदास भन्साळी, अलकाताई रुपवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर, काँग्रेसच्या काळात असलेला ३५० रुपयांचा गॅस १००० रुपये झाला. पेट्रोल डिझेल १०० च्या वर गेले. राज्यातील आघाडी सरकार सत्तेत येताच पहिला महत्वाचा निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला. भाजपाच्या कर्जमाफीसारखं रांगेत उभे करून, वेगवेगळ्या याद्या करून, अनेकांना त्याचा लाभ मिळू नये म्हणून नियम, अटी लावल्या नाहीत तर सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी कर्जमाफी राबविली. शेतकऱ्यांना संकटात मोठी मदत केली असेही पटोले म्हणाले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा ताकदीने फडकेल – नाना पटोले

Next Post

कॅमेऱ्यासमोर चेहरा लपवताना दिसले राज कुंद्रा, लोक म्हणाले…

Related Posts
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास खरच घटस्फोट घेणार ? जवळच्या मित्राने हा खुलासा केला

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास खरच घटस्फोट घेणार? जवळच्या मित्राने केला हा खुलासा

नवी दिल्ली: बॉलिवूड स्टार प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तिचा नवरा निक जोनास (Nick Jonas)…
Read More
abdul sattar

‘इतकी भिकार XX’ झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही….’  अब्दुल सत्तारांचं वक्तव्य 

जालना – कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.…
Read More
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर हॅकिंगचा प्रयत्न

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर हॅकिंगचा प्रयत्न

Indian Army| पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, पाकिस्तानकडून आता सायबर युद्धाचाही प्रयत्न सुरू झालाय.…
Read More