पुणे | (Naresh Mhaske) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्य सरकारने विमानाने परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांचे विवादित वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी म्हटले, “जे लोक कधीही विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणलं.”
म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी त्याच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संकटात अडकलेल्या पर्यटकांना परत आणून सरकारने उपकार केले का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
तसंच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याचं स्वीकृती आहे का? हा प्रश्नही विचारला जात आहे. म्हस्केंचे हे वक्तव्य राज्यातील राजकीय वातावरणात तणाव निर्माण करणारं ठरलं आहे, आणि अनेक नागरिकांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भारताने अटारी सीमा बंद केली, पाकिस्तानला मोठा धक्का बसणार; ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
डांबरातून काळ्याचे पांढरे करणे बंद झाल्याने त्यांची बोंबाबोंब सुरुय, शिंदे यांचा उबाठावर निशाणा
दहशतवाद्यांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार, आता जमिनीत गाडण्याची वेळ आलीय; नरेंद्र मोदींचा इशारा