‘राज्य सरकारच्या एका मंत्र्याला राजस्थानातून धमकीचा फोन यावा हे आश्चर्यच आहे’

'राज्य सरकारच्या एका मंत्र्याला राजस्थानातून धमकीचा फोन यावा हे आश्चर्यच आहे'

मुंबई – आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता नवाब मालिक यांना एक धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा फोन राजस्थानमधून केल्याचेही पुढे आले आहे.

दरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीने समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांना अडथळा निर्माण करू नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी नवाब मलिकांना दिली आहे.नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील कार्यालयात सकाळी 7.15 दरम्यान हा फोन आला असून सुरेश हुडा, असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला असे नवाब मलिक म्हणतात.राज्य सरकारच्या एका मंत्र्याला राजस्थानातून धमकीचा फोन यावा हे आश्चर्यच आहे. दोन्ही ठिकाणी तुमचीच सरकारे आहेत. करा कारवाई. कसली वाट बघतात? की फक्त तमाशा करताय असा टोमणा भातखळकर यांनी मारला आहे.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao

Previous Post
‘50 टक्के क्षमतेने नाट्यगृह उघडणार असतील तर सर्व निर्मात्यांना पण अर्धे भाडे माफ करावे’

‘50 टक्के क्षमतेने नाट्यगृह उघडणार असतील तर सर्व निर्मात्यांना पण अर्धे भाडे माफ करावे’

Next Post
महाराष्ट्रभर निघणार लखीमपुर खेरी किसान शहीद अस्थिकलश यात्रा!

महाराष्ट्रभर निघणार लखीमपुर खेरी किसान शहीद अस्थिकलश यात्रा!

Related Posts

आमदार रिवाबा जगते राणीसारखे जीवन, पतीही कमावतो चिक्कार पैसा; जाणून घ्या दोघांची संपत्ती

जामनगर –  जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार आणि भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा…
Read More
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे; Jayant Patil यांची टीका

शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे; Jayant Patil यांची टीका

Jayant Patil:- राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले…
Read More
तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा अनोखा फंडा, मुंबईतल्या युवकांसाठी भाजपचा युवा संवाद मेळावा

तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा अनोखा फंडा, मुंबईतल्या युवकांसाठी भाजपचा युवा संवाद मेळावा

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (Bharatiya Janata Party National President Jagat Prakash Nadda)…
Read More