Uddhav Thackeray | भाजपाला आता आरएसएसचीही गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे

Uddhav Thackeray | भाजपाला आता आरएसएसचीही गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे

Uddhav Thackeray | भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) काही दिवसापूर्वी म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहिल. आता त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झाला आहे आता त्यांना आरएसएसची गरज नाही. म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या संघाला भाजपा नष्ट करायला निघाला आहे. आरएसएसला १०० वे वर्ष धोक्याचे असून भाजपा आरएसएसलाही नकली संघ म्हणू शकतो, आरएसएसवर बंदीही घालू शकतो असा टोला उद्धव ठाकरें नी लगावला आहे. हॅाटेल ग्रॅंड हयात येथे इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भ्रष्टाचाराचे आरोप करुन बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजपा करत आहे. नरेंद्र मोदी यांना अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव आठवत असेल, मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी त्यांची अवस्था आहे. भाजपाने १० वर्ष महाराष्ट्राला बदनाम केले. मुंबईची लुट करून गुजरातला घेऊन गेले आता इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे. ४ जूनला देशातील जुमलापर्व संपणार असून अच्छे दिन ची सुरुवात होणार आहे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी खासदार हुसेन दलवाई, आशिष दुआ, बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Sharad Pawar | अन्न सुरक्षा कायदा डॉ. मनमोहनसिंह सरकारचा, नरेंद्र मोदींचा आरोप चुकीचा

Sharad Pawar | अन्न सुरक्षा कायदा डॉ. मनमोहनसिंह सरकारचा, नरेंद्र मोदींचा आरोप चुकीचा

Next Post
Mohan Yadav | काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा विश्वास

Mohan Yadav | काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा विश्वास

Related Posts
Ashish Shelar

प्रत्येक वेळी पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार!

मुंबई – ओबीसी आरक्षणा (OBC reservation) शिवाय मुंबई महापालिकेने वॉर्ड आरक्षणे जाहीर केली असली तरी ओबीसी आरक्षण मिळावेच असा…
Read More
Actress

२४ वर्षीय निर्मात्याने ४८ वर्षीय अभिनेत्रीकडे केली शरीरसुखाची मागणी, आधी बहीण म्हणत होता मग…

नवी दिल्ली – अनेक कलाकारांना कास्टिंग काउचसारख्या (Casting couch) घटनांना सामोरे जावे लागले आहे. यातूनच दक्षिण भारतीय अभिनेत्री…
Read More
Nana Patole | विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षडयंत्र; दंगेखोरांना अद्दल घडवा

Nana Patole | विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षडयंत्र; दंगेखोरांना अद्दल घडवा

Nana Patole | राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात…
Read More