Uddhav Thackeray | मुंबईतील सभा नरेंद्र मोदींची शेवटची सभा; ४ तारखेला संपूर्ण देश ‘डिमोदीनेशन’ करणार

Uddhav Thackeray | मुंबईतील सभा नरेंद्र मोदींची शेवटची सभा; ४ तारखेला संपूर्ण देश 'डिमोदीनेशन' करणार

Uddhav Thackeray | महाराष्ट्र हा शाहु, फुले, आंबेडकरांचा आहे, तो मोदीशाह यांचा होऊ देणार नाही. भाजपाने ४०० पारचा नारा दिला, आपण अब की बार भाजपा तडीपार चा नारा दिला आणि मग भाजपा गप्प झाले, त्यानंतर त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा काढला. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून लोक मृत्यूमुखी पडले त्याच रस्त्यावरून नरेंद्र मोदींनी वाजत गाजत रोड शो केला. शिवसेनेने भाजपाला कठीण काळात मदत केली त्या शिवसेनेला नकली म्हणता. १० वर्षात मोदींनी काय केले, प्रचारात ते सारखे हिंदू मुस्लीम, हिंदू मुस्लीम करत आहेत. कधी घुसखोर म्हणता, देशद्रोही ठरवता. देशाचे स्वातंत्र अबाधित ठेवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे. ज्या प्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर करुन त्या रात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे संपवल्या तसेच नरेंद्र मोदी हे शेवटचे मुंबईत आले आहेत, ४ तारखेला संपूर्ण देश डिमोदीनेशन केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठणकावून सांगितले.

बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची परिवर्तन सभा संपन्न झाली. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, AICC चे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना खासदार संजय राऊत, तुषार गांधी आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Sharad Pawar | हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही

Sharad Pawar | हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही

Next Post
Prakash Ambedkar | घाटकोपर दुर्घटना मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Prakash Ambedkar | घाटकोपर दुर्घटना मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Related Posts
Momos

ज्याचे फक्त नाव ऐकून तोंडाला पाणी सुटते ते मोमोज भारतात कसे पोहचले ?

momos : आजकाल जवळपास सगळ्यांनाच मोमोज (Momos) हे नाव माहीत आहे. भाज्या आणि मांसाने भरलेला हा फराळ लोकांच्या…
Read More
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी

बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी

Boys-4 : बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ बॅाक्स ॲाफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या बॅाईजची ही धमाल चौपट पटीने…
Read More
राज्यात कॉंग्रेसला गळती झाली सुरु; पहिला आमदार फुटला,अजितदादा गटाच्या गळाला लागला

Mumbai Congress | राज्यात कॉंग्रेसला गळती झाली सुरु; पहिला आमदार फुटला,अजितदादा गटाच्या गळाला लागला

Mumbai Congress : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना आता कॉंग्रेसला राज्यात गळती सुरु झाली आहे. वांद्रे पूर्व…
Read More