आम्ही एकत्र आल्याने कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असतील; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

आम्ही एकत्र आल्याने कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असतील; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्रात नवा राजकीय समीकरण पाहायला मिळालं आहे. तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे कुटुंबातील दोन प्रमुख नेते, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray), एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. हिंदी सक्तीविरोधातील लढ्यात विजय मिळाल्यानंतर आज दोघांनी एकत्र येत ‘विजयी मेळावा’ आयोजित केला.

या ऐतिहासिक मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत स्पष्ट केलं की, “आम्ही आज एकत्र आलो आहोत, ते कायम एकत्र राहण्यासाठीच!” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

याच वेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. “आम्ही एकत्र आलो म्हणून काही जणांचे पोट दुखू लागले आहे. कदाचित कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत असतील, रेडे कापत असतील!” असा टोला त्यांनी शिंदे गटावर लगावला.

Previous Post
आजपर्यंत वापर करून घेतला, आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहोत - उद्धव ठाकरे

आजपर्यंत वापर करून घेतला, आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहोत – उद्धव ठाकरे

Next Post
“लालकृष्ण आडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले, मग त्यांच्या हिंदुत्त्वावर शंका घ्यायची का?

“लालकृष्ण आडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले, मग त्यांच्या हिंदुत्त्वावर शंका घ्यायची का?

Related Posts
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्रात “सायबर सुरक्षा धोरण” तयार करण्याबाबत आशिष शेलार यांनी केली मोठी घोषणा

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्रात “सायबर सुरक्षा धोरण” तयार करण्याबाबत आशिष शेलार यांनी केली मोठी घोषणा

मुंबई | महाराष्ट्र राज्यात सायबर सुरक्षा धोरण ( Cyber ​​Security Policy) तयार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे माहिती व…
Read More
अभाविप कडून विद्यापीठात सुरक्षाविषयक मोर्चा..!

अभाविप कडून विद्यापीठात सुरक्षाविषयक मोर्चा..!

Pune University: दिनांक १ नोव्हेंबर २०२३ या दिवशी विद्यापीठामध्ये एस. एफ. आय. (स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया) या डाव्या…
Read More
महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात; रामदास आठवले यांची भूमिका

महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात; रामदास आठवले यांची भूमिका

पुणे | (Ramdas Athawale) दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत पार पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर,…
Read More