विदुर नीति : या 8 गुणांमुळे माणसाला प्रत्येक क्षेत्रात यश आणि मान-सन्मान मिळतो

पुणे – महात्मा विदुर हे नीतीचे अत्यंत जाणकार मानले जातात. राष्ट्रहित, मानवहित आणि जनहित याविषयी विदुर महाराज धृतराष्ट्राला वेळोवेळी अनेक गोष्टी सांगत असत. त्यांचे हे अनमोल शब्द आजही लोकांना दिशादर्शक तर आहेतच, पण आजच्या काळातही त्यांना अडचणीतून बाहेर काढून प्रगतीकडे नेणारे आहेत. महात्मा विदुरांनी माणसात असलेले ते आठ गुण सांगितले आहेत, ज्याचे पालन केल्याने माणसाची कीर्ती जगभर पसरते. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश आणि सन्मान मिळतो. या 8 गुणांबद्दल जाणून घेऊया.

त्यांच्या मते जो व्यक्ती आपल्या बुद्धीचा योग्य वापर करतो. त्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. त्याची कीर्ती सर्वत्र पसरते. महात्मा विदुर यांच्या मते ज्या व्यक्तीचा स्वभाव सहज आणि साधा असतो. समाजातील सर्वजण त्यांचा आदर करतात आणि लोक त्यांना खूप आवडतात.महात्मा विदुरांच्या मते, जो व्यक्ती आपल्या इंद्रियांना (मन) आपल्या नियंत्रणात ठेवतो. त्याला समाजात सर्वत्र मान-सन्मान मिळतो.

शहाण्या माणसाची कीर्ती सगळीकडे असते. त्याच्या ज्ञानामुळे त्याला जगभर प्रसिद्धी मिळते. जो व्यक्ती पराक्रमी आणि शूर असतो तसेच परिस्थिती बघून विचारपूर्वक बोलणारी व्यक्ती जगात प्रत्येकाला आवडते. दान केल्याने व्यक्तीची कीर्ती वाढते. त्याला सर्वत्र आदर प्राप्त होतो.जे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांना सर्वत्र आदर मिळतो आणि लोक अशा लोकांच्या पाठीशी उभे राहतात.