अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात… आम्ही कुणाला घाबरणार नाही – नवाब मलिक

मुंबई : अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एजन्सीचा वापर केला असता तर अर्धे मंत्रीमंडळ तुरुंगात असते असे वक्तव्य केले होते त्याचा नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

सत्तेचा गैरवापर करायचा असेल तर तुम्ही कितीही लोकांना तुरुंगात टाकू शकता परंतु आम्ही घाबरणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना त्यांनी सावधपणे आरोप केले पाहिजे असे सांगतानाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

दरम्यान बरेचसे उंदीर आम्ही काही दिवसातच बाहेर काढू असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

हे ही पहा: