नवी दिल्ली | ( Vikram Misri) 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे सध्याची तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असून भारत केवळ त्याला प्रत्युत्तर देत आहे, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल स्पष्ट केले. नवी दिल्लीतील संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी भारताची अधिकृत भूमिका मांडली.
“भारताला तणाव वाढवायचा नाही, मात्र देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठलीही आगळीक पाकिस्ताननं केल्यास त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल,” असा ठाम इशारा मिस्री ( Vikram Misri) यांनी दिला. ऑपरेशन सिंदूरमध्ये केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं असून कोणत्याही नागरी भागावर हल्ला करण्यात आलेला नाही, यावर त्यांनी भर दिला.
या पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्ताननं दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट चा उल्लेख करण्यास विरोध केल्याची बाबही त्यांनी उघड केली. “या संघटनेनं पहलगाम हल्ल्याची जबाबदारी उघडपणे स्वीकारली असूनही पाकिस्तान त्यांचं समर्थन करत आहे,” असं मिस्री म्हणाले. पाकिस्तानच्या संरक्षण आणि लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या दफनविधींना हजेरी लावल्याची छायाचित्रंही त्यांनी माध्यमांसमोर सादर केली.
काल पाकिस्ताननं पूँछमधील गुरुद्वाराला लक्ष्य केल्याचा आरोपही भारतानं केला. या पत्रकार परिषदेला संरक्षण विभागातर्फे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सहभाग घेतला. कर्नल कुरेशी यांनी सांगितलं की, काल पाकिस्ताननं भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्यानं तो हाणून पाडला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली! भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने 50 ड्रोन्स पाडले
ज्याने पाकिस्तानला सळो की पळो केलं ते एस-400 सिस्टीम नक्की आहे तरी काय?
धरणही उद्ध्वस्त! सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताची पाकिस्तानला दुसरी जोरदार चपराक