कोण काय बोलतोय,कोण काय करतोय कळतचं नाही – बाळासाहेब थोरात 

औरंगाबाद –  या सरकारमध्ये नक्कीच गडबड असल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहे. तर ज्या पद्धतीने सरकार चालत आहे, त्यामुळे शिंदे गटातील लोकांच्या मनात नैराश्य असल्याचं माझं देखील मत असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

थोरात म्हणाले की, राज्य सरकार बनले कसं, सरकार झालं कसं, जनसामन्य माणसामध्ये त्यांच्याबद्दल काय मत आहे, हे पुन्हा-पुन्हा सांगायची गरज नाही. आधी तर सरकार बनत असतांना मंत्रीमंडळ बनायला तयार नाही, मंत्रीमंडळ झालं तर मंत्र्यांना खाते मिळत नव्हते आणि खाते मिळाल्यावर पालकमंत्री यांच्या नियुक्तीला उशीर असं सर्व काही पाहायला मिळत आहे.  दिल्लीच्या वाऱ्या करता-करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थकून गेले. त्यामुळे कोण काय बोलतोय,कोण काय करतोय कळतचं नसल्याचा टोला थोरात यांनी लगावला.