15 वर्षात काॅंग्रेस-राष्ट्रवादीने काय झक मारली? हे आपण पहात आहोत – तानाजी सावंत

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आमदार प्रा. तानाजी सावंत (Shivsena MLA Pro. Tanaji Sawant) यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात व राज्यात शिवसेनेची ताकद अफाट आहे. आपण एकट्याच्या ताकदीवर भगवा फडकवू शकतो. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असली तरी आपल्याला त्यांची गरज नाही. असं सावंत यांनी म्हटले आहे.

15 वर्षात काॅंग्रेस-राष्ट्रवादीने काय झक मारली? (What did Congress-NCP do in Last 15 Years?) हे आपण पहात आहोत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी असली तरी आपल्याला त्यांची गरज नाही. काॅंग्रेस-राष्ट्रवादीलाच शिवसेनेची गरज आहे .तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचा माणूस बसू शकला असता, पण स्थानिक नेत्यामुळेच ते होऊ शकले नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.