प्रभू श्रीरामाशी तुमचं काय वैर आहे? हिंदूंचा इतका द्वेष का करता? हार्दिक पटेल यांचा कॉंग्रेसला सवाल

अहमदाबाद – काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता पाटीदार अनामत आंदोलन समिती (PASS) नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी जुन्या पक्षावर टीका केली आहे. भगवान श्रीराम यांच्या तुमचं काय वैर आहे? हिंदूंचा इतका द्वेष का करता अशा प्रश्न हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला विचारला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “काँग्रेस पक्ष जनतेच्या भावना दुखावण्याचं काम करतो हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवतो असं मी आधीही म्हटलं होतं. माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसच्या नेत्याने राम मंदिराच्या विटांवर कुत्रे लघवी करतात असं विधान केलं होतं. भगवान श्रीरामाशी तुमचं काय वैर आहे? हिंदूंचा इतका द्वेष का करता असा प्रश्न मला काँग्रेसला विचारायचा आहे.