संपत्ती जप्त करायला लागले तेव्हा मुख्यमंत्र्यांना राग आला; राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. सोबतच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ठामपणे हिंदूंच्या बाजूने आपण उभे राहणार आहोत असे देखील संकेत दिले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

यावेळी ED च्या कारवाई बाबत देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना नोटिस आली, पण हे गेले नाही. संपत्ती (Uddhav Thackeray net worth)  जप्त करायला लागले तेव्हा मुख्यमंत्र्यांना राग आला. जनतेनं नादान राजकारणाला बळी पडू नये, एवढीच अपेक्षा आहे.BEST चे प्लॉट बिल्डरांच्या घशात घालताना, मुंबईत प्लॉट नाही सापडला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.