‘भारत जोडो’ अभियान काँग्रेसचं तरी कुठे राहिलं? पृथ्वीराज चव्हाण यांची टीका 

नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पक्षाच्या प्रस्तावित आणि बहुचर्चित अशा ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये आपण जाणार नसल्याचे म्हटले आहे.  आता ही यात्रा कॉँग्रेसची तरी कुठे राहिली. योगेंद्र यादव सांगत फिरतात मी भारत जोडो यात्रा काढतो आहे अन् कॉँग्रेस माझ्यासोबत आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

चव्हाण म्हणाले की, माझ्याविरोधात प्रतिक्रिया याव्यात यासाठी पक्षाच्या मुख्यालयात बसलेले काही नेते कामाला लागले आहेत. या सगळ्या नेत्यांवर मोदींची छाप आहे, पक्षाची घसरण व्हायला तेच कारणीभूत आहेत. माझी भूमिका स्पष्ट आणि पक्ष हिताची आहे. पक्षात घटनेप्रमाणेच कार्यकारिणीच्या निवडणुका झाल्यात असे म्हणणाऱ्या नेत्यांसोबत मी टीव्हीवर खुली चर्चा करायला तयार आहे. गुलाम नबी आझाद हे पक्ष सोडून बाहेर पडले असले तरी ते देशव्यापी राजकारण करणार नाहीत. त्यांचा पक्ष केवळ जम्मू काश्मीरपुरताच मर्यादित असेल. असं त्यांनी म्हटले आहे.