ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला न्यायालयाने स्थगिती का दिली ? फडणविसांनी सांगितले नेमके कारण

देवेंद्र फडणवीस

 मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधे इतर मागासवर्गासाठी असलेल्या 27 टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या आरक्षणासाठी राज्य शासनानं काढलेल्या अध्यादेशाला; तसंच त्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती सी. टी रवीकुमार यांच्या पीठानं काल हा आदेश दिला.

आयोग स्थापन करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधे पुरेसं प्रतिनिधित्व नसल्याबाबत आकडेवारी गोळा केल्याशिवाय 27 टक्के ओबीसी कोट्याची अंमलबजावणी शक्य नसल्याचं न्यायालयानं सांगितल. आयोगाद्वारे अशी आकडेवारी गोळा केल्याशिवाय राज्य निवडणूक आयोगालाही ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं याआधीच अधिसूचित केलेला निवडणूक कार्यक्रम चालू ठेवायलाही राज्य निवडणूक आयोगाला परवानगी देता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

या प्रकरणी पुढच्या आदेशापर्यंत कोणत्याही मध्यावधी किंवा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगानं काढू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 13 डिसेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, या निकावरून आता राज्यात राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले असून सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती दुर्दैवी आहे ! मा. सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा सांगितले की, राज्य मागासवर्ग आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय अभ्यास करून अहवाल तयार न करता थेट अध्यादेश काढणे अयोग्य आहे. सर्वपक्षीय बैठकीत नेमका हाच मुद्दा मी मांडला होता. पण, ते न करता शासनाने अध्यादेश काढला.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणाले होते,शासनाने सुधारित आदेश दिल्यास 1 महिन्यात आपण अहवाल देऊ शकतो. मात्र, त्यावर कार्यवाही न करता अध्यादेश काढल्याने आज त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.

माझी आजही कळकळीची विनंती आणि आग्रही मागणी आहे की, यात तत्काळ सुधारणा केली तर आरक्षण परत मिळू शकते आणि ओबीसींना त्यांचा हक्क आपण पुन्हा प्रदान करू शकतो. कृपया माझे 27 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबरचे ट्विटस बघावे. तीच बाब सर्वोच्च न्यायालयाने आज अधोरेखित केली.

Previous Post
बाळासाहेब

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या – प्रवीण तोगडिया

Next Post
नाना पटोले

ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका 

Related Posts
मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत अजित पवारांना राज्यात फिरू देणार नाही; मराठा नेता आक्रमक

मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत अजित पवारांना राज्यात फिरू देणार नाही; मराठा नेता आक्रमक

Rambhau Gaikwad | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत…
Read More
mukesh ambani

रिलायन्स इंडस्ट्रीजने न्यूयॉर्कचे आलिशान हॉटेल मँडरिन ओरिएंटल खरेदी करण्यासाठी केला करार

मुंबई –  रिलायन्स इंडस्ट्रीजने न्यूयॉर्कचे प्रीमियम लक्झरी हॉटेल मंदारिन ओरिएंटल न्यूयॉर्क सुमारे 735 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार…
Read More
मोहन भागवत म्हातारे झालेत; लोकसंख्येवरुन केलेल्या विधानावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मोहन भागवत म्हातारे झालेत; लोकसंख्येवरुन केलेल्या विधानावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लोकसंख्येबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.…
Read More