भारतानं नुकतीच पाकिस्तानवर रात्रीच्या अंधारात एअर स्ट्राईक ( Air strike) केली आणि एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला – एअर स्ट्राईक नेहमी रात्रीच का होतात? यामागे फक्त एक नाही तर अनेक महत्वाची कारणं आहेत. रात्रीच्या वेळेत दुश्मनाची हालचाल कमी असते आणि त्यांच्या रडार प्रणाली देखील मर्यादित प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे लक्ष्य गाठणं अधिक सोपं होतं.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे “नाईट व्हिजन” टेक्नॉलॉजी. भारतासह अनेक देशांकडे अंधारातही स्पष्टपणे पाहू शकणारी उपकरणं असतात. त्यामुळे आपले सैनिक, पायलट आणि ड्रोन ऑपरेटर अचूक लक्ष्य भेदू शकतात. दुसरीकडे, शत्रूच्या सैन्याकडे अशी सुविधा नसल्याने ते अधिक असहाय्य ठरतात. अंधाराचा फायदा घेत शत्रूला कोणतीही पूर्वसूचना न देता धडक देता येते.
एअर स्ट्राईकच्या ( Air strike) वेळी गोपनीयता आणि आश्चर्याचा घटक सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. दिवसा कारवाई केल्यास अधिक लोक, वाहनं, सिव्हिलन्स असतात, त्यामुळे निष्पाप लोकांच्या जिवाला धोका संभवतो. मात्र रात्री ही जोखीम कमी होते. म्हणूनच, एअर स्ट्राईकसाठी रात्रीचा काळ सर्वोत्तम मानला जातो.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली! भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने 50 ड्रोन्स पाडले
ज्याने पाकिस्तानला सळो की पळो केलं ते एस-400 सिस्टीम नक्की आहे तरी काय?
धरणही उद्ध्वस्त! सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताची पाकिस्तानला दुसरी जोरदार चपराक