औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून सभेची सुरुवात करणार का? रवी राणा यांच्या मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई – काल एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) औरंगाबादच्या दौऱ्यावर  होते . या दौऱ्यादरम्यान त्यांनी  शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी  स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या (Aurangzeb)  कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले. (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)

सुरुवातीला त्यांनी एका मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले.

दरम्यान, स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण केल्याने ओवेसी आणि त्यांच्या पक्षावर आता टीका होत आहे. यातच आता आता आमदार रवी राणा यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी राजेंच्या विचारांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात संभाजी नगर येऊन ओवेसी फुलं वाहतात. माझ्या राजकीय जीवनामध्ये आतापर्यंत ती कबर कोणी उघडली, तिथं फुलं वाहिली हे मी फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पाहिलेलं आहे, असं राणा म्हणालेत.

आम्ही हनुमान चालिसा वाचतो तर खासदार आमदाराला तुरुंगात टाकलं जातं. देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे. जर तुम्ही हिंदुत्वाच्या एवढ्या गोष्टी करता, खरं तुम्ही हिंदू असाल तर हनुमान चालिसाचं वाचन करुन सभेची सुरुवात कराल की संभाजीनगरमध्ये औरंगजेबच्या कबरवर फुलं वाहायला जाल, असा महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूंचा तुम्हाला सवाल आहे