सर्वांच्या साथीने पुन्हा आपण सत्ता आणू आणि पुन्हा सेनेचा मुख्यमंत्री करु – ठाकरे 

मुंबई – मुंबईत काल पार पडलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘यंदाचा रावण वेगळा आहे, आतापर्यंत 10 तोंडांचा रावण होता, आता 50 खोक्यांचा बकासूर आहे.’ असं वक्तव्य ठाकरेंनी केले.

शिंदे गट आणि भाजप (BJP) सरकारवर टीका करताना ”या सरकारला उद्या शंभर दिवस होतील त्यात 90 दिवस दिल्लीवारीत गेले  गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशी सरकारची अवस्था, असल्याचंही ठाकरे म्हणाले. अखेर उपस्थितांना धन्यवाद करताना जे झालं ते चांगलच झालं असं म्हणताना शिंदे गटाला बांडगुळ म्हणत ते छाटले गेले हे चांगलचं झालं असं ठाकरे म्हणाले. तसंच सर्वांच्या साथीने पुन्हा आपण सत्ता आणू आणि पुन्हा सेनेचा मुख्यमंत्री करु, असं ते म्हणाले.