कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे ?

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे(Bjp) हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, कालच्या या सभेवर सत्ताधारी(Rulling party) आणि विरोकांच्या (oposition)प्रतिक्रिया येत आहेत. या सभेमध्ये भाजपवर झालेल्या टीकेनंतर आता  भाजप नेते तुषार भोसले(Bjp leader Tushar Bhosale)यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे ? असा सवाल तुषार भोसलेंनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले,  कश्मिरी पंडित राहुल भट(kasmiri pandit rahul bhat) यांची हत्या केलेल्या आतंकवाद्यांना(terrorist) मोदी सरकारने २४ तासाच्या आत संपवलं कारण ते हिंदुत्वाचे रक्षक आहेत पण इथे पालघर(palghar) मधे साधुंची ठेचून हत्या करण्यात आली याला २४ महिने झाले तरी आजपर्यंत हत्या करणाऱ्यांना दंड नाही की हिंदु समाजावर गरळ ओकणार्या शर्जिल उस्मानीवर (sharjeel usmani)कारवाई नाही आणि कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे ? असं भोसले म्हणाले.